काेरची : तालुक्यातील २९ ग्रामपंचायती असून २६ संगणक परिचालकांनी १४ जानेवारी २०२१ च्या अन्यायकारक शासननिर्णयाची काेरची येथे हाेळी करून शासनाच्या धाेरणाचा निषेध केला. शासनाने केलेल्या तुटपुंज्या मानधनवाढीच्या निर्णयाविराेधात पंचायत समितीसमाेर नारेबाजी करण्यात आली.२०११ पासून महाराष्ट्र शासनाने ई-पंचायत प्रकल्प अंतर्गत संग्राम प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पांतर्गत संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली. सध्या हाच प्रकल्प ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने चालवण्यात येत असून मागील दहा वर्षांपासून हे संगणक परिचालक नाममात्र पगारावर सेवा देत आहेत.परंतु त्याचा शासनाने अजूनपर्यंत पाहिजे तसा मोबदला यांना दिला नाही. नेहमीच शासनकर्त्यांनी आश्वासने दिली परंतु आश्वासन अजून पर्यंत पूर्ण झाले नाही. संगणक परिचालकांनी अनेकदा आंदोलने केलेले आहेत. ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांना पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अशी एकच मागणी परिचालक व संघटनेच्या वतीने करण्यात आली. परंतु शासनाने यावर निर्णय न घेता केवळ मानधनामध्ये एक हजार रुपये वाढ करून ताेंडाला पाने पुसली आहे. या निर्णयाच्या विराेधात २५ जानेवारी राेजी कोरची पंचायत समितीसमोर संगणक परिचालक यांनी जाहीर निषेध करून आंदोलन केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी व शासनाकडे केलेल्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष विकास उंदीरवाडे, उपाध्यक्ष प्रदीप नंदेश्वर, सचिव भूपेंद्र कोसारे व इतर संगणक परिचालक उपस्थित हाेते.
बाॅक्स....
ऑनलाईन कामांचा भार ऑपरेटरवरच
मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक पदावर अनेक युवक, युवती कार्यरत असून तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पूर्ण ऑफलाईनचे कामे ऑनलाईन करण्याचे काम संगणक परिचालक करीत आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत येणार सर्वच प्रकारचा लेखा-जोखा ऑनलाईन करणे, ग्रामसभांना सर्व प्रकारचे दाखले देणे, शासनाने कोअर अप्लिकेशन व ग्रामपंचायत डाटा ऑनलाईन करणे, शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक योजना ग्रामपंचायतस्तरावर राबविणे, अशा विविध प्रकारचे कामे परिचालकांकडून केले जात आहेत.