शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद

By admin | Updated: June 15, 2014 23:32 IST

राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

गडचिरोली : राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सदर निधी जुलै २०१४ पर्यंत खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासींच्या विकासासाठी शेकडो योजना असून दरवर्षी या योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. आदिवासींच्या विकासासाठी आदिवसाी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र असे दोन प्रकार पडतात. राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विहीर बांधून दिल्यास सिंचनाची सुविधा होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन सिंचन विहिरींची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत १ कोटी १४ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. कुपनलिकांचे बांधकाम करण्यासाठी मात्र एकही निधी देण्यात आला नाही. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ९० पेक्षा जास्त आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा मात्र अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्वश्रूत आहे. आश्रमशाळांना पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे १ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शौचालय बांधकामासाठी सुमारे ५७ लाख ५० हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर निधी आदिवासी उपयोजनांवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. चार महिन्यामध्ये सदर निधी खर्च करावा लागणार असल्याने ५० टक्क्यापेक्षा जास्त काम झाले असलेल्या कामावरच सदर निधी खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)