शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद

By admin | Updated: June 15, 2014 23:32 IST

राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

गडचिरोली : राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सदर निधी जुलै २०१४ पर्यंत खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासींच्या विकासासाठी शेकडो योजना असून दरवर्षी या योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. आदिवासींच्या विकासासाठी आदिवसाी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र असे दोन प्रकार पडतात. राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विहीर बांधून दिल्यास सिंचनाची सुविधा होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन सिंचन विहिरींची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत १ कोटी १४ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. कुपनलिकांचे बांधकाम करण्यासाठी मात्र एकही निधी देण्यात आला नाही. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ९० पेक्षा जास्त आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा मात्र अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्वश्रूत आहे. आश्रमशाळांना पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे १ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शौचालय बांधकामासाठी सुमारे ५७ लाख ५० हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर निधी आदिवासी उपयोजनांवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. चार महिन्यामध्ये सदर निधी खर्च करावा लागणार असल्याने ५० टक्क्यापेक्षा जास्त काम झाले असलेल्या कामावरच सदर निधी खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)