शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

जलसंधारणाची केवळ ७२७ कामे पूर्ण

By admin | Updated: April 18, 2015 01:38 IST

पाणी टंचाई निर्मुलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

गडचिरोली : पाणी टंचाई निर्मुलन आणि जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १५२ गावांची निवड करण्यात आली. या गावात एकूण चार हजार ११८ जलसंधारणाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला. १७ एप्रिलपर्यंत १२८ गावात जलसंधारणाची ७२७ कामे पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, वन, जिल्हा परिषद (सिंचाई), पंचायत समिती, लघु सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलसंधारणाची कामे करावयाची आहेत. कृषी विभागामार्फत ७२ गावातील ६६५ कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली असून १३० कामे सुरू आहेत. पंचायत समितीमार्फत ६७ गावातील ४८ कामे पूर्ण झाली असून १७१ कामे सुरू आहेत. वन विभागामार्फत ३६ गावातील १० कामे पूर्ण झाले असून ५० काम सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत ३३ गावातील केवळ चार कामे पूर्ण झाले असून ६९ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विभागामार्फत जिल्ह्यात मजगी, माती नाला बांधणे व दुरूस्ती, सिमेंट नाला दुरूस्ती, शेततळे, बोळी दुरूस्ती नुतनीकरण, वनतलाव, खोदतळे, मामा तलाव, गाव तलाव दुरूस्ती, साठवण बंधारा, सिंचन विहिर आदी कामांवर विविध विभागामार्फत १७ एप्रिलपर्यंत एकूण आठ कोटी ८१ लाख ६१ हजार रूपये खर्च झाला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची आराखड्यातील सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)