शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

स्वामित्वधन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 01:00 IST

सन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज, ...

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच : गौणखनिजातून ४५ कोटी ७६ लाखांचा महसूल प्रशासनाला प्राप्त दिलीप दहेलकर गडचिरोलीसन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज, परमिट तसेच रेती परमिट व रॉयल्टीमधून एकूण ४५ कोटी ७६ लाख ११ हजार ८५२ रूपयांचा महसूल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर गौण खनिज स्वामित्वधन वसुलीची सरासरी टक्केवारी १३८.६७ आहे. विशेष म्हणजे, शासनाने जिल्हा प्रशासनाला सन २०१६-१७ या वर्षाकरिता ३३ कोटी रूपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. प्रशासनाने केवळ नऊ महिन्यात सदर उद्दिष्ट पूर्ण करून उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्याची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय गिट्टी, मुरूम, माती, दगडाच्या खाणीही मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे तसेच रेतीघाटावरून रेतीचे उत्खनन करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित कंत्राटदाराला आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन परवाना घ्यावा लागतो. त्यानंतरच सदर कंत्राटदार आपल्या विशिष्ट क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक नियमानुसार करीत असते. गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला लीज व परमिट घ्यावा लागतो. यासाठी विविध विभागाकडून जिल्हा खनिकर्म विभागाला महसूल प्राप्त होत असतो. राज्य शासनाने सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाला गौण खनिज स्वामित्वधन वसुलीबाबत ३३ कोटींचे सुधारित उद्दिष्ट दिले होते. १२ तालुक्यातील सहा उपविभाग मिळून आतापर्यंत एकूण ४५ कोटी ७६ लाख ११ हजार ८५२ रूपयांचा महसूूल मिळाला आहे. स्वामित्वधन वसुलीत अहेरी उपविभाग सर्वाधिक आघाडीवर आहे. या उपविभागाने एकूण ३१ कोटी ३२ लाख ९६ हजारांचा महसूल मिळविला आहे.रेती घाटापासून ३३ कोटी ७५ लाख मिळालेरेतीघाट परवान्यातून संबंधित डिलर व कंत्राटदाराकडून एप्रिल ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला एकूण ३३ कोटी ७५ लाख ९३ हजार ७०२ रूपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये देसाईगंज तालुक्यातून २ कोटी २१ लाख, आरमोरी तालुक्यातून १ कोटी २९ लाख ६६ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दोन्ही तालुके मिळून देसाईगंज उपविभागातून एकूण ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गडचिरोली उपविभागात रेती घाटापासून १ कोटी ६५ लाख ६९ हजार, चामोर्शी उपविभागातून ४२ लाख, कुरखेडा उपविभागातून २१ लाख ९९ हजार, अहेरी उपविभागातून २७ कोटी ९४ लाख ८३ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, अहेरी उपविभागात रेती घाटापासून सर्वाधिक महसूल मिळाला आहे. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागाला रेती घाटापासून एकही रूपयाचा महसूल प्राप्त झाला नाही.