शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रोहयोची पाच हजार कामे पूर्ण

By admin | Updated: October 20, 2014 23:13 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्यावतीने २३ हजार कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार १९ कामे पूर्णत्वास आली आहेत.

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्यावतीने २३ हजार कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार १९ कामे पूर्णत्वास आली आहेत. यातून हजारो मजुरांना रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक रोहयो मजूराला वर्षातून किमान १०० दिवसांचे काम देणे सक्तीचे आहे. एखाद्या मजुराने कामाची मागणी करूनही काम न दिल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतुदही या योजनेत आहे. या योजनेंतर्गत रस्ते, मजगी, मामा तलावाचे खोलीकरण आदी कामे केली जातात. सध्या १ हजार २५९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी ४९२ कामे पूर्ण झाली आहेत. ७६७ कामे अंतिम टप्यात आहेत. मजगीची ३ हजार ९५ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी ७०० कामे पूर्ण झाली आहेत. २ हजार ३९५ कामे प्रगती पथावर आहेत. बोडी खोलीकरणाची २ हजार ३९० कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी सध्यास्थितीत १ हजार १० कामे पूर्ण झाली आहेत. १ हजार ३८० कामे सुरू आहेत. नरेगा मधून निर्मल भारत अभियानांतर्गत ४ हजार ४१७ शौचालयाची बांधकामे करण्यात आली आहेत. निर्मल भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयासाठी ५ हजार ४०० रूपयांचे अनुदान राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात येते. या सर्व शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेने २०१४- १५ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेंतर्गत कामांसाठी ८२ कोटी रूपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४६ कोटी १० लाख रूपये खर्च झाले आहेत. रोहयोेंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपिकाचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना धानपिकाच्यामाध्यमातून रोजगार मिळतो. त्यामुळे या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात रोहयो कामासाठी फारसे मजूर मिळत नाही. त्याचबरोबर या कालावधीत पाऊस राहत असल्याने रोहयोची कामे करणे अशक्य होते. परिणामी या कालावधीत रोजगार हमी योजनेची कामे अत्यंत कमी प्रमाणात सुरू असतात. नोव्हेंबर महिन्यानंतर मात्र जिल्ह्यातील मजूर रिकामा होतो. त्याला इतर कोणतेही काम राहत नसल्याने तो रोजगार हमी योजनेच्याच कामावर जाणे पसंत करतो. डिसेंबर ते जून या कालावधीत सर्वाधिक रोहयोची कामे गडचिरोली जिल्ह्यात केली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. याही वर्षी याच कालावधीत रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. रोहयोच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या शेतात माती टाकण्याचे कामही केले जातात. फसल निघाल्यानंतर हे काम करणे सहज शक्य होते. (नगर प्रतिनिधी)