शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आदिवासींच्या परिपूर्ण माहितीचा संग्रह तयार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:12 IST

आदिवासी विकास विभाग व महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत आदिवासी कुटुंबांचे वैयक्तिक व कौटुंबिक विस्तृत माहिती संकलित करण्यासाठी १० मे पासून सर्वेक्षण सुरू आहे.

ठळक मुद्दे आश्रमशाळा शिक्षकांमार्फत होत आहे सर्वेक्षणपहिल्यांदाच उपक्रम

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभाग व महामंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत आदिवासी कुटुंबांचे वैयक्तिक व कौटुंबिक विस्तृत माहिती संकलित करण्यासाठी १० मे पासून सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाचे हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून प्रत्येक प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विकास विभागाकडे माहिती सादर करण्यात येत आहे. आदिवासी विभागात अशा प्रकारच्या विस्तृत व परिपूर्ण सर्वेक्षणाचे काम पहिल्यांदाच होत आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी व अपर आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत या सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विभागाच्या पुढाकाराने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांसह संपूर्ण महाराष्ट्रात २९ प्रकल्प कार्यालये आहेत. या कार्यालयाअंतर्गत राज्यभरात शासकीय व अनुदानित मिळून ५०० वर आश्रमशाळा आहेत. या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांमार्फत आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे.गडचिरोली प्रकल्पात ११ मे पासून आश्रमशाळांचे शिक्षक हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सर्वेक्षण करीत आहेत. सदर सर्वेक्षण हे येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे. आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सर्वेक्षणातील माहितीचा गोषवारा प्रकल्प कार्यालयाला सादर केला जाईल.आदिवासी विकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या सर्वेक्षणाचा एकत्रित अद्यावत डेटा नंतर ऑनलाईन स्वरूपातही उपलब्ध होणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात येत असलेले हे सध्याचे सर्वेक्षण वस्तुनिष्ठ, विस्तृत व अद्यावत पद्धतीचे आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबांच्या कल्याणासाठी चांगल्या योजना आखून त्या अंमलात आणण्यासाठी या सर्वेक्षणाचा चांगला फायदा होणार आहे. आदिवासी विकास विभागाला काम करताना प्रोत्साहन मिळणार आहे. सदर सर्वेक्षणाचा उद्देश स्पष्ट झाला नसला तरी हे सर्वेक्षण गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या कल्याणासाठी होत आहे.- डॉ.राहुल गुप्ता,

प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली

सर्व्हेक्षणातील माहितीच्या आधारे योजनाआदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी कुटुंबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्या की नाही, हे सुद्धा या सर्वेक्षणातून दिसून येणार आहे. आदिवासी महामंडळातर्फे आदिम जमातीला खावटी कर्ज किंवा धान्य वाटप करण्याची योजना राबविण्याची शक्यता आहे. शासनस्तरावर याचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र या संदर्भात महामंडळ व प्रकल्प कार्यालयाकडे स्पष्ट माहिती नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक जे.पी.राजुरवार यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात शिक्षक कर्तव्यावरएका आश्रमशाळेच्या परिसरात १० ते १२ गावांचा समावेश असतो. संबंधित आश्रमशाळेतील शिक्षकाला या गावांमधील आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करावे लागत आहे. यासाठी शिक्षक अंगणवाडी सेविका व ग्रामसेवकांची मदत घेत आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया बंद आहे. मात्र शासकीय कर्तव्य समजून आश्रमशाळांचे शिक्षक व कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. बरेच शिक्षक मन लावून हे काम करीत असले तरी काही शिक्षकांनी मात्र भर उन्हाळ्यातील सर्वेक्षणाच्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना