शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

जिल्ह्यातील अनुकंपाधारक आक्रमक

By admin | Updated: December 28, 2016 03:08 IST

शासकीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने येरझारा मारल्यानंतरही शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत

विजय खरवडे यांची माहिती : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार गडचिरोली : शासकीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने येरझारा मारल्यानंतरही शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता जिल्ह्यातील सर्व अनुकंपाधारक एकवटले असून येत्या आठ दिवसात मुंबईच्या मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, वन विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११७ आदिवासी विकास विभागाअंतर्गत ३० तसेच इतर विभागाअंतर्गतही अनेक अनुकंपाधारक गेल्या सात-आठ वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधीही यासंदर्भात उदासीन आहेत, असा आरोप उपस्थित अनुकंपाधारकांनी केला. मंगळवारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विभागातील अनुकंपाधारकांमधून वर्ग ३ व ४ ची पदे भरण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, अशी माहिती खरवडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला मनोज सयाम, चंद्रशेखर उसेंडी, जयदेव नैताम, सुषमा किरंगे, प्रभाकर पदा, अमोल किरंगे, शुभांगी कोहळे, मनोज नरूले, आशिष कुमरे, लतीफ भोयर, श्वेता जिवने, शारदा पेंदाम आदी अनुकंपाधारक उपस्थित होते.