शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

देशात समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी

By admin | Updated: March 20, 2016 01:11 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते.

विद्यापीठात परिसंवाद : ई. झेड. खोब्रागडे यांचे प्रतिपादनगडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते. मात्र अद्यापही भारतात समानतेवर आधारित १०० टक्के समाजव्यवस्था निर्माण झाल्याचे दिसत नाही. भारतातील सर्व नागरिकांच्या विकासासाठी तसेच परिवर्तनासाठी समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने शनिवारी स्थानिक गोंडवाना विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत अ‍ॅड. संदेश भालेकर, प्रा.डॉ. नंदाजी सातपुते, प्रा. दिलीप बारसागडे, पत्रकार रोहिदास राऊत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, भष्ट्राचार, अन्याय, अत्याचार या विषमतेच्या गोष्टी आहेत. डॉ. आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक न्याय विभागावर बहुजनांच्या कल्याणाची व विकासाची मोठी जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानाच्या बाहेर कोणीच नाही. शोषित, आदिवासी, दलित, पीडित व सर्वसामान्य माणसाला देशात सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी भारतीय संविधानाने समान अधिकार व हक्क दिले आहेत. भारतीय संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीतून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही खोब्रागडे यांनी यावेळी केले. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय देशात १०० टक्के सामाजिक न्याय व समानता प्रस्थापित होणार नाही, असे सांगितले. याप्रसंगी प्रा. दिलीप बारसागडे, रोहिदास राऊत यांनीही मार्गदर्शन केले. संचालन विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार डॉ. दीपक जुनघरे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ- भालेकरडॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानातून सर्वच नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. गणतंत्र राज्याचे मार्गदर्शक तत्त्वही या संविधानात अंतर्भूत असल्याने भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. संदेश भालेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी विविध विचारवंताचे दाखले देऊन भारतीय संविधानाची महती विशद केली.