शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

देशात समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी

By admin | Updated: March 20, 2016 01:11 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते.

विद्यापीठात परिसंवाद : ई. झेड. खोब्रागडे यांचे प्रतिपादनगडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते. मात्र अद्यापही भारतात समानतेवर आधारित १०० टक्के समाजव्यवस्था निर्माण झाल्याचे दिसत नाही. भारतातील सर्व नागरिकांच्या विकासासाठी तसेच परिवर्तनासाठी समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने शनिवारी स्थानिक गोंडवाना विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत अ‍ॅड. संदेश भालेकर, प्रा.डॉ. नंदाजी सातपुते, प्रा. दिलीप बारसागडे, पत्रकार रोहिदास राऊत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, भष्ट्राचार, अन्याय, अत्याचार या विषमतेच्या गोष्टी आहेत. डॉ. आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक न्याय विभागावर बहुजनांच्या कल्याणाची व विकासाची मोठी जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानाच्या बाहेर कोणीच नाही. शोषित, आदिवासी, दलित, पीडित व सर्वसामान्य माणसाला देशात सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी भारतीय संविधानाने समान अधिकार व हक्क दिले आहेत. भारतीय संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीतून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही खोब्रागडे यांनी यावेळी केले. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय देशात १०० टक्के सामाजिक न्याय व समानता प्रस्थापित होणार नाही, असे सांगितले. याप्रसंगी प्रा. दिलीप बारसागडे, रोहिदास राऊत यांनीही मार्गदर्शन केले. संचालन विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार डॉ. दीपक जुनघरे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ- भालेकरडॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानातून सर्वच नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. गणतंत्र राज्याचे मार्गदर्शक तत्त्वही या संविधानात अंतर्भूत असल्याने भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. संदेश भालेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी विविध विचारवंताचे दाखले देऊन भारतीय संविधानाची महती विशद केली.