शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

समितीपुढे वाचला रिक्तपदांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:33 IST

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसोईसुविधांचा अभाव : भेटीतून आदिवासी समितीने जाणली तथ्ये

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी रिक्त पदांमुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. याशिवाय अपेक्षित सोईसुविधांचा अभाव असून त्यात सुधारणा करण्यास वाव असल्याची नोंद त्यांनी आपल्या निरीक्षणात घेतली.विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालविकास) आर.एल. लामतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आणि इतर अधिकारीगण या दौऱ्यात उपस्थित राहून आपापल्या विभागाची माहिती देत होते.सकाळी ८.३० वाजता बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या भेटींना सुरूवात झाली. चातगावच्या अंगणवाडीतील मुले चांगली प्रशिक्षित होती. पण इमारतीच्या गळक्या छताला तात्पुरते आवरण लावले होते. सोडे येथील अंगणवाडीत मात्र अमृत आहाराचे कडधान्य पोहोचलेच नव्हते. या गावातील रेशन कार्डवर धान्य पुरवठ्यातही गडबड असल्याचे निदर्शनास आले.मेंढा या गावात देवाजी तोफा, प्रा.कुंदन दुफारे, ग्रामसेवक आर.एच.कुनघाडकर यांनी त्यांचे स्वागत करून उपक्रमांची माहिती दिली. याशिवाय गावाजवळच्या वनतलावातील गाळ काढण्याची मागणी केली.६० ते ७० टक्के मुली अ‍ॅनिमियाग्रस्तसोडे या गावातील शासकीय कन्या आश्रमशाळेतील महिला वैद्यकीय अधिकाºयाने ६० ते ७० टक्के मुली अ‍ॅनिमियाग्रस्त असल्याचे सांगितले. त्यांचे हिमोग्लोबिन ९ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यांना अतिरिक्त पोषक घटक दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू त्या मुली आता वसतिगृहात नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पंडित यांनी मुलींची थायलेसेमिया तपासणीही करण्याची सूचना केली.रोजगाराअभावी उद्भवले अनेक प्रश्नकुपोषण, आरोग्य हे प्रश्न रोजगाराअभावी निर्माण झाले आहेत. गर्भवती किंवा स्तनदा मातांना सध्या अमृत आहार योजनेतून घरी शिजवण्यासाठी दिले जात असलेले कडधान्य ती एकटीच खात नाही. त्यात घरातील सर्वच लोक वाटेकरी होतात. परिणामी त्या आहारातून तिला आवश्यक असलेले पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. संपूर्ण कुटुंबालाच पोषक आहाराची गरज आहे. पण आर्थिक स्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नाही, असे निरीक्षण समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी नोंदविले.