शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

आष्टी तालुका निर्मितीसाठी कटिबद्ध

By admin | Updated: September 5, 2016 01:30 IST

आष्टी तालुका निर्मितीची मागणी फार जुनी आहे. तसा प्रस्ताव शासन दरबारी आहे. त्यामुळे जेव्हा नवीन तालुक्यांची निर्मिती होईल.

आमदारांचे आश्वासन : आष्टी ग्राम पंचायतीत सभाआष्टी : आष्टी तालुका निर्मितीची मागणी फार जुनी आहे. तसा प्रस्ताव शासन दरबारी आहे. त्यामुळे जेव्हा नवीन तालुक्यांची निर्मिती होईल. त्यावेळेस आष्टी गावाचा समावेश नवीन तालुक्यांमध्ये निश्चितच होईल. आष्टी तालुका निर्मितीसाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी ग्राम पंचायत सभागृहात आयोजित कार्यकर्ते व नागरिकांच्या सभेत दिले. सभेला माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, जि. प. सदस्य यशवंत धुडसे, माजी जि. प. सदस्य दिवाकर कुंदोजवार, ग्रा. पं. सदस्य रवी नागूलवार, आनंद कांबळे, चामोर्शीचे नगरसेवक प्रशांत एगलोपवार, विठ्ठल आवारी, प्रभूदास खोब्रागडे, कुशवाह उपस्थित होते. आष्टी येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. एमआयडीसी झाल्यास आष्टीत मोठा उद्योग निर्माण होण्यास मदत होईल, असेही आ. डॉ. देवराव होळी म्हणाले. विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने मंडळ स्थापन होणार असून, सीआरपीएफ भरती चार मंडळातून होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना नोकरी मिळणार आहे, अशी माहिती बाबुराव कोहळे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन ग्राम विस्तार अधिकारी बी. डी. चौधरी यांनी केले. नागरिकांकडून समस्यांचा भडीमारआलापल्ली मसाहत हा भाग आष्टीत समाविष्ट करावा, असा प्रश्न दिवाकर कुंदोजवार उपस्थित केला असता, त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष याच प्रश्नावर होता. अभयारण्य ओलांडून मार्र्कंडा येथे जाणे योग्य आहे काय, आम्हाला आष्टी ग्राम पंचायतीत समाविष्ट करावे, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर याबाबत महसूल विभागाचे अधिकारी व एसडीओ यांच्याशी लवकरच बैठक लावून सदर प्रश्न सोडवू, असे आश्वासन आमदारांनी दिले. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांची शिष्यवृत्ती द्यावी, जिल्ह्यातील आदिवासी व्यतिरिक्त नोकरभरती बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, जिल्ह्याचे पुनर्सर्वेक्षण करून आरक्षण निश्चित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली असता, आमदारांनी सदर प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.