शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती अर्जांबाबत महाविद्यालये उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:35 IST

सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे आॅफलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश होते.

ठळक मुद्देनवीन व नूतनीकरणाचे एकही अर्ज प्राप्त नाही : विद्यार्थी शिक्षण शुल्काच्या लाभापासून वंचित राहणार

दिलीप दहेलकर ।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे आॅफलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश होते. मात्र गडचिरोली येथील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला चालू आर्थिक वर्षाचे नवीन व नूतनीकरणाचे जिल्ह्यातील एकाही महाविद्यालयाचे आॅफलाईन अर्ज अद्यापही प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्काच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काबाबतच्या अर्जाविषयी महाविद्यालयस्तरावर करावयाच्या कार्यवाही संदर्भात गडचिरोली, देसाईगंज व अहेरी या तीन ठिकाणी शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. या कार्यशाळेत सन २०१७-१८ मधील द्वितीय, तृतीय व चवथ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नूतनीकरणाचे अर्ज व नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याबाबत महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर समाजकल्याण विभागाच्या वतीने वारंवार तोंडी सूचना देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी या कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले. परिणामी समाजकल्याण कार्यालयात आतापर्यंत सन २०१७-१८ चे नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज एकाही महाविद्यालयाकडून प्राप्त झाले नाही. केवळ नूतनीकरणाचे अर्ज या कार्यालयाला महाविद्यालयस्तरावरून प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी १०० टक्के निधी मंजूर करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केलेले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर करण्यासाठी महाविद्यालयस्तरावरून दिरंगाई होत असल्याने अनेक विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविद्यालयाकडून होणाऱ्या दिरंगाईचा मागास विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.२२२ महाविद्यालये संलग्नितभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्काच्या लाभासाठी गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे नोंदणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २२२ महाविद्यालये समाजकल्याण कार्यालयाशी सदर योजनेच्या लाभाकरिता संलग्नित आहे. यामध्ये इयत्ता ११ वी ते पदवी, पदव्युत्तर व इतर अभ्यासक्रम चालविणाºया महाविद्यालयांचा समावेश आहे.द्वितीय, तृतीय व चवथ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या नूतनीकरणाचे अर्ज आॅनलाईन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालयांनी तसेच २०१७-१८ मधील नवीन आॅफलाईन अर्ज २० मार्च २०१८ पूर्वी सहायक आयुक्त समाजकल्याण गडचिरोली या कार्यालयात सादर करावे, यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संबंधित महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी संपर्क साधावा.- विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त,समाजकल्याण गडचिरोली