शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह योजना गुंडाळणार

By admin | Updated: February 8, 2016 01:26 IST

राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे सन २०१२ पासून शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे.

नोंदणीकृत विवाह योजनेला प्राधान्य : स्वयंसेवी संस्थांची दुकानदारी होणार बंददिलीप दहेलकर गडचिरोलीराज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे सन २०१२ पासून शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत वधूंच्या माता-पित्यांपेक्षा स्वयंसेवी संस्थांना अधिक लाभ होत होता. योजनेचे अनुदान लाटण्यासाठी अनेक संस्थांकडून विवाहित जोडप्यांचे पुन्हा विवाह लावून देण्याचे प्रकार वाढले होते. परिणामी या योजनेचे सकारात्मक उद्दीष्ट प्राप्त होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे आता राज्य शासन सदर योजना गुंडाळण्याच्या प्रयत्नात आहे. त्या दृष्टीने शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सामूहिक विवाह योजनेऐवजी नोंदणीकृत विवाह योजनेवर महिला व बाल विकास विभागाने पूर्णत: लक्ष केंद्रीत करावे, अशा आशयाचे बाल विकास विभागाच्या आयुक्तांचे पत्र गडचिरोली कार्यालयाला प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ३० सप्टेंबर २०११ च्या जीआरनुसार शुभमंगल सामूहिक विवाह व नोंदणीकृत विवाह योजना जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ इतरमागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील वधूंच्या मातेला दिला जातो. ओबीसी व खुला प्रवर्गातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत १० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. तर सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रती जोडप्यामागे दोन हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र गेल्या चार-पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनुदान लाटण्याचे काम केले. दरम्यान अनेक जोडप्यांचे दुसऱ्यांदा लग्नही लावण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी वधू मातेला स्वयंसेवी संस्थांवर निर्भर राहावे लागत होते. त्यामुळे बऱ्याचदा वधुकडील मंडळी स्वयंसेवी संस्थांच्या कारभारामुळे त्रस्त होत होती. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजना व्यापक स्वरूपात राबविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने सर्व जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत. सामूहिक विवाह योजनेला कात्री लावण्यात आली असल्याने स्वयंसेवी संस्थांची आर्थिक दुकानदारी पूर्णपणे बंद होणार आहे. निधीची कमतरता नाहीगडचिरोली जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजनेसाठी सद्यस्थितीत दीड लाख रूपयांचा निधी उपलब्ध आहे. याशिवाय या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव वाढल्यास पुन्हा लाखो रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील अधिकाधिक नोंदणीकृत विवाह करून जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजूर वधूंच्या मातांना या योजनेचा लाभ देण्याचा या विभागाचा मानस आहे. भाजपप्रणीत राज्य शासनाने लाभार्थ्यांना फायदेशीर नसलेल्या अनेक योजना बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर अनेक जुन्या योजनांमध्ये नवीन फेरबदल करून सुधारित योजना अंमलात आणल्या जात आहेत. योजनेचे यश पाहून राज्य शासन योजनांबाबत निर्णय घेत आहे. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना दिलासा देण्यासाठी नोंदणी विवाहाला प्राधान्य देण्यात येत आहे.योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रेशेतकरी, शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, वधू कुटुंबाचे एक लाखापर्यंत वार्षीक उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र, ओबीसींकरिता जात प्रमाणपत्र, उपनिबंधकांच्या स्वाक्षरीचे नोंदणी विवाह प्रमाणपत्र, नोंदणी विवाहाच्या वेळी उपनिबंधक कार्यालयात जे आवश्यक कागदपत्र सादर करण्यात आले, त्या कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत, वधूच्या आईचे बँक खाते क्रमांक, वर-वधूच्या वयाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्र योजनेच्या लाभासाठी आवश्यक आहे.सामुहिक विवाह योजना टप्प्याटप्प्याने बंद होणारनोंदणी विवाह योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न आटोपणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. नोंदणी विवाहाची व्याप्ती वाढल्यावर सामुहिक विवाह योजना आपोआप बंद पडेल, असे आयुक्तांच्या पत्रात म्हटले आहे.