शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

भामरागडमध्ये ६० आदिवासी जोडप्यांचे सामूहिक शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:09 IST

ज्या आदिवासी युवक-युवतींचे रितसर लग्न होण्याची शाश्वती नसते, त्यामुळे ज्यांच्यात कधी वितुष्ट आल्यास पती-पत्नीचा कायदेशिर हक्क मिळण्याची शक्यता नसते, ...

ठळक मुद्देपोलीस व आदिवासी विभागाचा उपक्रम : विविध भेटवस्तूंसह शासकीय अनुदानही दिले

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : ज्या आदिवासी युवक-युवतींचे रितसर लग्न होण्याची शाश्वती नसते, त्यामुळे ज्यांच्यात कधी वितुष्ट आल्यास पती-पत्नीचा कायदेशिर हक्क मिळण्याची शक्यता नसते, अशा तब्बल ६० जोडप्यांचे कायदेशिर सोपस्कार पार पाडत विवाह लावून देण्याचे काम शुक्रवारी भामरागड पोलीस स्टेशन व आदिवासी प्रकल्प कार्यालयाने केले.पांढºया शुभ्र कपड्यातील नवरदेव आणि हिरव्या साडीतील वधू आणि त्यांची वाजतगाजत निघालेली वरात भामरागडवासीयांसाठी कुतूहलाचा विषय झाली होती. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यानंतर त्याच ठिकाणी सर्व जोडप्यांना विवाह नोंदणीची प्रमाणपत्रे, कन्यादान योजनेचा धनादेश देण्यात आले.भामरागड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक अंजली राजपूत यांनी या सोहळ्यासाठी विशेष पुढाकार घेतला. येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे कन्यादान योजनेचा ५ लाखांचा निधी होता. तो कसा उपयोगी लावायचा आणि नागरिकांना कसा लाभ द्यायचा असा प्रश्न प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांच्यापुढे होता. त्यांनी यासंदर्भात पो.निरीक्षक राजपूत यांच्याशी चर्चा करताच त्यांनी पुढाकार घेत आपल्या यंत्रणेमार्फत परिसरातील गावांना सूचना करून आदिवासी समाजातील विवाहेच्छुक जोडप्यांचा शोध लावला. त्यांची सर्व माहिती मिळवून त्यांचे जन्माचे दाखले, वधुचे बँक खाते काढण्यापासून सर्व तयारी केली.