शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

देलनवाडी धान केंद्रासाठी व्यवस्थापकाला घेराव

By admin | Updated: May 31, 2016 01:23 IST

उन्हाळी धान पीक निघून १५ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी वैरागड परिसरातील देलनवाडी येथील धान खरेदी

वैरागड : उन्हाळी धान पीक निघून १५ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी वैरागड परिसरातील देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी देलनवाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाला सोमवारी घेराव घातला. वैरागड परिसरातील काही शेतीला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी धान पीक मे महिन्याच्या सुरुवातीलाच निघाले. या धानाच्या खरेदीसाठी १५ मे ते ३० जून या कालावधीपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करणे सुरू करणे आवश्यक होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ४० धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र आरमोरी तालुक्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी गोदामातून खरीप हंगामाच्या धानाची उलच झाल्याबरोबर धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले होते. मात्र आमदारांच्याही निर्देशाला केराची टोपली दाखवत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही.खरीप हंगामासाठी बियाणे, खत खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्री करण्याची लगबग सुरू केली आहे. मात्र धान खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक यांना घेराव घालून धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. चार दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. घेरावानंतर आदिवासी विकास महामंडळ कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)