शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:32 IST

गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पाण्यासाठी हातपंप व सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देवीज बिल थकल्याचा परिणाम : ३५ वर गावांमध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पाण्यासाठी हातपंप व सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.महाराष्टÑ जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै., अहेरी तालुक्यातील लगामबोरी, देसाईगंज तालुक्यातील पोटगाव व अहेरी शहरात मिळून एकूण चार मोठ्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या चारही पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत अनेक वर्षांपूर्वी ग्रामपंचायतस्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. या नळ योजनेच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. नळ पाणी पुरवठा करण्यासाठीची मोटार तसेच वीज पुरवठा व इतर बाबी योग्यस्थितीत ठेवणे ही सर्व कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. मात्र जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीचे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच ग्रामपंचायतीचे आर्थिक नियोजन ढासळल्याने या १६ योजना अनेक दिवसांपासून बंद पडल्या आहेत. परिणामी या गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बंद असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, चिंतलपेठ, राजाराम आदी चार योजनांचा समावेश आहे.भामरागड तालुक्यातील लाहेरी ही नळ योजना बंद आहे. गडचिरोली तालुक्यातील नगरी, बामणी, चामोर्शी तालुक्यातील कानोली, देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, एटापल्ली तालुक्यातील गेदा, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, विवेकानंदपूर आदी नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील गुमलकोंडा, जाफ्राबाद, कोर्ला व नारायणपूर या चार पाणी योजना बंद आहेत.वीज पुरवठ्याचे बिल थकल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे १० नळ योजना बंद झाल्या आहेत. तर इतर सहा पाणी योजना इतर कारणाने बंद आहेत. नळ योजना बसविलेल्या नदीची पाणी पातळी खालावल्यामुळे नदी काठावर बसविण्यात आलेल्या मोठ्या टाकीत पाणी खेचण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. एकूणच ग्रामपंचायतीच्या भोंगळ काराभारामुळे १६ पाणी योजना बंद आहेत.मे महिन्यात पाणी संकट तीव्र होणारतब्बल १६ पाणी योजना बंद असलेल्या जवळपास ३० गावांमध्ये हातपंप, सार्वजनिक विहीर तसेच तलाव, बोड्या आदी पाणी स्त्रोत उपलब्ध आहे. आता एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे नदी नाल्यातील पाणी तळाशी गेले आहे. विहीर व हातपंपाची पाणी पातळी आता झपाट्याने खालावत आहे. मे महिन्यात कडक उन्हाळा सुरू होणार असल्याने गावातील हातपंप व विहिरी निकामी ठरणार आहेत. परिणामी नळ योजना बंद असलेल्या या गावांमध्ये मे महिन्यात पाणी संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.२०० फूट खोलीवर असतो सार्वजनिक हातपंपबहुतांश नागरिक आपल्या घरी पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यासाठी खासगी हातपंप बसवतात. मात्र हे हातपंप १०० ते १२५ खोल फूट मारले जाते. त्यामुळेच याचा खर्च ५० ते ६० हजारांच्या आसपास येतो. मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात येणारा सार्वजनिक हातपंप हा २०० फूट खोलवर खोदला जातो. सदर हातपंपाची खोली ६० मीटरवर असायला हवी. तशा मार्गदर्शक सूचनाही संचालनालय, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा महाराष्टÑ राज्य, पुणे यांनी दिल्या आहे. त्यामुळे ६० मीटर खोल हातपंप बसविण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येतो. संचालनालयाने १ लाख ४० रुपये इतकी खर्च मर्यादा प्रत्येक सार्वजनिक हातपंप बसविण्यावर मंजूर केली आहे.