शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:32 IST

गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पाण्यासाठी हातपंप व सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देवीज बिल थकल्याचा परिणाम : ३५ वर गावांमध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पाण्यासाठी हातपंप व सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.महाराष्टÑ जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै., अहेरी तालुक्यातील लगामबोरी, देसाईगंज तालुक्यातील पोटगाव व अहेरी शहरात मिळून एकूण चार मोठ्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या चारही पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत अनेक वर्षांपूर्वी ग्रामपंचायतस्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. या नळ योजनेच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. नळ पाणी पुरवठा करण्यासाठीची मोटार तसेच वीज पुरवठा व इतर बाबी योग्यस्थितीत ठेवणे ही सर्व कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. मात्र जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीचे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच ग्रामपंचायतीचे आर्थिक नियोजन ढासळल्याने या १६ योजना अनेक दिवसांपासून बंद पडल्या आहेत. परिणामी या गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बंद असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, चिंतलपेठ, राजाराम आदी चार योजनांचा समावेश आहे.भामरागड तालुक्यातील लाहेरी ही नळ योजना बंद आहे. गडचिरोली तालुक्यातील नगरी, बामणी, चामोर्शी तालुक्यातील कानोली, देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, एटापल्ली तालुक्यातील गेदा, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, विवेकानंदपूर आदी नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील गुमलकोंडा, जाफ्राबाद, कोर्ला व नारायणपूर या चार पाणी योजना बंद आहेत.वीज पुरवठ्याचे बिल थकल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे १० नळ योजना बंद झाल्या आहेत. तर इतर सहा पाणी योजना इतर कारणाने बंद आहेत. नळ योजना बसविलेल्या नदीची पाणी पातळी खालावल्यामुळे नदी काठावर बसविण्यात आलेल्या मोठ्या टाकीत पाणी खेचण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. एकूणच ग्रामपंचायतीच्या भोंगळ काराभारामुळे १६ पाणी योजना बंद आहेत.मे महिन्यात पाणी संकट तीव्र होणारतब्बल १६ पाणी योजना बंद असलेल्या जवळपास ३० गावांमध्ये हातपंप, सार्वजनिक विहीर तसेच तलाव, बोड्या आदी पाणी स्त्रोत उपलब्ध आहे. आता एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे नदी नाल्यातील पाणी तळाशी गेले आहे. विहीर व हातपंपाची पाणी पातळी आता झपाट्याने खालावत आहे. मे महिन्यात कडक उन्हाळा सुरू होणार असल्याने गावातील हातपंप व विहिरी निकामी ठरणार आहेत. परिणामी नळ योजना बंद असलेल्या या गावांमध्ये मे महिन्यात पाणी संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.२०० फूट खोलीवर असतो सार्वजनिक हातपंपबहुतांश नागरिक आपल्या घरी पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यासाठी खासगी हातपंप बसवतात. मात्र हे हातपंप १०० ते १२५ खोल फूट मारले जाते. त्यामुळेच याचा खर्च ५० ते ६० हजारांच्या आसपास येतो. मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात येणारा सार्वजनिक हातपंप हा २०० फूट खोलवर खोदला जातो. सदर हातपंपाची खोली ६० मीटरवर असायला हवी. तशा मार्गदर्शक सूचनाही संचालनालय, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा महाराष्टÑ राज्य, पुणे यांनी दिल्या आहे. त्यामुळे ६० मीटर खोल हातपंप बसविण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येतो. संचालनालयाने १ लाख ४० रुपये इतकी खर्च मर्यादा प्रत्येक सार्वजनिक हातपंप बसविण्यावर मंजूर केली आहे.