शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून पाणी योजना बंद

By admin | Updated: May 23, 2017 00:40 IST

येथील नळी पाणी पुरवठा योजना मागील तीन वर्षांपासून बंद आहे.

पातळी खालावली : भामरागडात पाणी टंचाईची समस्या तीव्र लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : येथील नळी पाणी पुरवठा योजना मागील तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे भामरागड येथे पाणी टंचाईचे सावट तीव्र झाले असतानाही नगर पंचायतीचे पाणी पुरवठा योजना दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत चालेले आहे. भामरागड या तालुका स्थळाच्या सभोवताल पामुलगौतम, इंद्रावती व पर्लकोटा या नद्यांचा वेढा आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची या शहराला कमतरता भासत नाही. सुमारे १० वर्षांपूर्वी या भामरागड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले. मात्र तीन वर्षांपूर्वी या योजनेत काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तेव्हापासून सदर योजन बंद आहे. ही योजना दुरूस्तीसाठी नगर पंचायतीने कोणतेही पाऊल उचलले नाही. परिणामी भामरागड शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठा योजना दुरूस्त करण्यासाठी जास्त निधीची आवश्यकता असल्याने लोेकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.भामरागड तालुक्यात सुमारे १२० गावे आहेत. यातील बहुतांश गावांमध्ये हातपंप व विहीर हेच पाण्याचे साधन आहे. मात्र दुर्गम भागातील हातपंप व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. भामरागड तालुक्यातील ९० टक्के जनता शेती हाच व्यवसाय करते. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. या पशुधनाला चरण्यासाठी जंगलात सोडले जाते. पाळीव जनावरे गावासभोवताल असलेल्या मामा तलावाचे पाणी पिऊन येत होते. आता मात्र तलाव व बोड्या आटल्याने जनावरांना बाहेर पाणी मिळत नाही. परिणामी त्यांना घरीच पाणी पाजावे लागते. त्यामुळेही पाणी संकट तीव्र झाले आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.