शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:28 IST

यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे.

ठळक मुद्देतांदळाचाही पुरवठा नाही : साहित्य खरेदीचे वांदे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. तात्पुरत्या स्वरूपात शाळांच्या मुख्याध्यापकांनी पोषण आहाराचा खर्च करावा अशी सूचना शिक्षण संचालकांनी केली असली तरी एवढ्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्य झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घराची वाट धरावी लागत आहे.जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून १७८७ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत १ लाख १९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वर्ग १ ते ५ चे ६३ हजार ६५५ तर वर्ग ६ ते ८ चे ३६ हजार ५४१ विद्यार्थी आहेत. प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे. पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडे विचारणा केली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पोषण आहारासंदर्भातील एक याचिका निकाली निघायची असल्यामुळे यावर्षीच्या शालेय सत्राकरिता निविदा प्रक्रियेला उशिर होत असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांनीच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था करावी असे सूचविले. मात्र एवढ्या संख्येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्यप्राय झाले आहे. परिणामी मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे. जुन्या कंत्राटदाराने १६ जूनपर्यंत पुरविलेला साठा जुलै-आॅगस्टपर्यंत पुरला. पण आता दोन महिन्यांपासून पोषण आहाराचे वांदे सुरू आहेत.तांदूळ पुरवठ्याचेही गौडबंगालगेल्यावर्षीपासून तांदळाचा पुरवठा कंत्राटदाराकडून न करता वडसा येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून केला जात आहे. यावर्षीही गेल्यावर्षीच्या वाहतूकदाराला तांदळाचा पुरवठा करण्यास सांगितले. परंतू श्रीहरी राईस अ‍ॅग्रो लि.गोंदिया या वाहतूकदाराने केवळ जुलै-आॅगस्ट महिन्यातच तांदूळ पुरविले. नंतर तांदूळही पोहोचले नाही. त्यामुळे हे तांदूळ कुठे गायब झाले? असा प्रश्न अनेक शाळांना पडला आहे.काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत. पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तांदळाचा पुरवठा आम्ही करू, बाकीचे साहित्य तुम्ही खरेदी करून नंतर बिल सादर करा असे सांगितले होते. पण दोन महिन्यांत अनेक ठिकाणी तांदूळही पुरवठा केला नाही. त्यामुळे पोषण आहार देणे कठीण झाले आहे.- संजय नार्लावर, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ