शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पोषण आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:28 IST

यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे.

ठळक मुद्देतांदळाचाही पुरवठा नाही : साहित्य खरेदीचे वांदे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. तात्पुरत्या स्वरूपात शाळांच्या मुख्याध्यापकांनी पोषण आहाराचा खर्च करावा अशी सूचना शिक्षण संचालकांनी केली असली तरी एवढ्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्य झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घराची वाट धरावी लागत आहे.जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून १७८७ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत १ लाख १९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वर्ग १ ते ५ चे ६३ हजार ६५५ तर वर्ग ६ ते ८ चे ३६ हजार ५४१ विद्यार्थी आहेत. प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे. पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडे विचारणा केली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पोषण आहारासंदर्भातील एक याचिका निकाली निघायची असल्यामुळे यावर्षीच्या शालेय सत्राकरिता निविदा प्रक्रियेला उशिर होत असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांनीच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था करावी असे सूचविले. मात्र एवढ्या संख्येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्यप्राय झाले आहे. परिणामी मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे. जुन्या कंत्राटदाराने १६ जूनपर्यंत पुरविलेला साठा जुलै-आॅगस्टपर्यंत पुरला. पण आता दोन महिन्यांपासून पोषण आहाराचे वांदे सुरू आहेत.तांदूळ पुरवठ्याचेही गौडबंगालगेल्यावर्षीपासून तांदळाचा पुरवठा कंत्राटदाराकडून न करता वडसा येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून केला जात आहे. यावर्षीही गेल्यावर्षीच्या वाहतूकदाराला तांदळाचा पुरवठा करण्यास सांगितले. परंतू श्रीहरी राईस अ‍ॅग्रो लि.गोंदिया या वाहतूकदाराने केवळ जुलै-आॅगस्ट महिन्यातच तांदूळ पुरविले. नंतर तांदूळही पोहोचले नाही. त्यामुळे हे तांदूळ कुठे गायब झाले? असा प्रश्न अनेक शाळांना पडला आहे.काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत. पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तांदळाचा पुरवठा आम्ही करू, बाकीचे साहित्य तुम्ही खरेदी करून नंतर बिल सादर करा असे सांगितले होते. पण दोन महिन्यांत अनेक ठिकाणी तांदूळही पुरवठा केला नाही. त्यामुळे पोषण आहार देणे कठीण झाले आहे.- संजय नार्लावर, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ