शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

आॅनलाईन परीक्षा पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:13 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही.

ठळक मुद्दे प्रशासनाकडे निवेदन : कौशल्य विकास मंत्र्यांकडे मागणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर सैद्धांतिक परीक्षा ओएमआर सिटचा वापर करून ५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. परंतु याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. या परीक्षेच्या स्वरूपाबाबत प्रशिक्षणार्थी अनभिज्ञ आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेबाबत अचानक निर्णय आल्याने प्रशिक्षणार्थी भयभित झाले आहेत. पूर्व सूचना न देता व पूर्व तयारी न करता शेवटच्या क्षणी सेमिस्टरच्या आॅनलाईन परीक्षा पद्धतीमुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आयटीआय अंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थी दहावी उत्तीर्ण असतात तर काही प्रशिक्षणार्थी दहावी अनुत्तीर्ण असतात. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असेलच असे नाही. संगणकाचे ज्ञान असेल तरीसुद्धा एकाएकी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर आॅनलाईन परीक्षा थोपविण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. त्यामुळे आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून आॅनलाई परीक्षा बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. निवेदन देताना आयटीव्हीओ कार्यकर्ते विनोद मडावी, अंकूश कोकोडे, अधिर गेडाम, पीतांबर हरो, शरद वेलादी, राहूल पेंदाम, सावन चिकराम, शेषराव गावडे, रत्नमाला आत्राम, शीतल पेंदाम, स्वाती कोडाप, पूजा उईके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परीक्षा धोरणात विसंगतीचा आरोपएकाच व्यवसायाच्या सेमिस्टरच्या प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षा जिल्हा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने व तालुका केंद्रावर ओएमआर शिटचा वापर करून आॅफलाईन पद्धतीने घेणे हे धोरण विसंगत व समान न्याय व्यवस्थेत भेदभावपूर्ण असल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा स्वरूपात बदल करीत असताना तज्ज्ञ समिती नेमून प्रशिक्षणार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, प्रशिक्षणार्थ्यांस स्तर पारदर्शकता आदी बाबींचा विचार करून परीक्षा द्यावी, आॅनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.