शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आॅनलाईन परीक्षा पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:13 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही.

ठळक मुद्दे प्रशासनाकडे निवेदन : कौशल्य विकास मंत्र्यांकडे मागणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर सैद्धांतिक परीक्षा ओएमआर सिटचा वापर करून ५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. परंतु याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. या परीक्षेच्या स्वरूपाबाबत प्रशिक्षणार्थी अनभिज्ञ आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेबाबत अचानक निर्णय आल्याने प्रशिक्षणार्थी भयभित झाले आहेत. पूर्व सूचना न देता व पूर्व तयारी न करता शेवटच्या क्षणी सेमिस्टरच्या आॅनलाईन परीक्षा पद्धतीमुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आयटीआय अंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थी दहावी उत्तीर्ण असतात तर काही प्रशिक्षणार्थी दहावी अनुत्तीर्ण असतात. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असेलच असे नाही. संगणकाचे ज्ञान असेल तरीसुद्धा एकाएकी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर आॅनलाईन परीक्षा थोपविण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. त्यामुळे आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून आॅनलाई परीक्षा बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. निवेदन देताना आयटीव्हीओ कार्यकर्ते विनोद मडावी, अंकूश कोकोडे, अधिर गेडाम, पीतांबर हरो, शरद वेलादी, राहूल पेंदाम, सावन चिकराम, शेषराव गावडे, रत्नमाला आत्राम, शीतल पेंदाम, स्वाती कोडाप, पूजा उईके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परीक्षा धोरणात विसंगतीचा आरोपएकाच व्यवसायाच्या सेमिस्टरच्या प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षा जिल्हा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने व तालुका केंद्रावर ओएमआर शिटचा वापर करून आॅफलाईन पद्धतीने घेणे हे धोरण विसंगत व समान न्याय व्यवस्थेत भेदभावपूर्ण असल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा स्वरूपात बदल करीत असताना तज्ज्ञ समिती नेमून प्रशिक्षणार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, प्रशिक्षणार्थ्यांस स्तर पारदर्शकता आदी बाबींचा विचार करून परीक्षा द्यावी, आॅनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.