शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

दुर्गम भागातील १२ शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:57 IST

१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अतिदुर्गम भागातील १२ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देसीईओंचे आदेश : जवळच्या शाळेत होणार समायोजन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अतिदुर्गम भागातील १२ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत ६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चवथ्या वर्गापर्यंतच्या शाळा आहेत. या शाळांसाठी दोन शिक्षक नेमले जातात. काही वर्गामध्ये विद्यार्थीसुद्धा नाही. कमी पटसंख्येमुळे शाळेचा विकास करतानाही शासनाला अडचणीचे होत होते. केवळ शिक्षक शिकवतील त्याच्याच भरवशावर विद्यार्थ्यांना राहावे लागत होते. कमी पटसंख्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भाव रूजण्यास अडचण निर्माण होत होती. विद्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळा बंद केल्या आहेत, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे दुसºया शाळेत समायोजन केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र निघताच शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.बंद पडलेल्या शाळाबंद पडलेल्या शाळांमध्ये सिरोंचा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मृदुकृष्णापूर, मुगापूर, कोत्तागुडम (सिरकोंडा), रमन्नापेठा, चंदाराम, मुलदिला, कोत्तागुडम (कोत्तापल्ली), चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद मुलींची शाळा घोट, राजे धर्मराव प्राथमिक शाळा घोट, कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरंडी, धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापळा व अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटापूर या शाळांचा समावेश आहे. शासनाच्या नियमानुसार या शाळांचे जवळच्या जिल्हा परिषदेशाळेमध्ये समायोजन केले जाणार आहे. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.शासनाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्नशाळा बंद पडल्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शिक्षकांकडून शासनाच्या या निर्णयाचा विरोध होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा महत्त्वाचा उद्देश शासन सांगत असले तरी खर्चात बचत करणे हाच एकमेव उद्देश आहे. प्रत्येक शिक्षकाचे किमान वेतन ५० हजार रूपये आहे. दोन शिक्षकांच्या वेतनावर शासन प्रती १ लाख रूपये असे वर्षाचे १२ लाख रूपये खर्च करते. शाळेचा प्रशासकीय खर्च जवळपास तीन लाख रूपये पकडला तर वर्षाचा १५ लाख रूपये खर्चुन केवळ पाच ते १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणजेच शासन प्रती विद्यार्थ्यावर जवळपास दीड ते दोन लाख रूपये खर्च करीत आहे. शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुद्धा एवढी फीज नाही. तेवढा खर्च विद्यार्थ्यांवर होत आहे. तरीही चवथीच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता व लिहिता येत नाही, अशी गंभीर स्थिती आहे. त्यामुळे या शाळा बंद करून एक किमी अंतरावर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.