शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मुलचेरा शहरात स्वच्छतेची ऐसीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:14 IST

स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेच्या कामाकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष : सप्टेंबरपासून घणकचरा व्यवस्थापनाची कामे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.तीन वर्षांपूर्वी मुलचेरा ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी मुलचेराच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये होती. मात्र ग्रामपंचायतपेक्षाही वाईट अवस्था नगर पंचायतीच्या कार्यकाळात शहराची झाल्याचे दिसून येत आहे.नगर पंचायतीला स्थायी स्वरूपाचा मुख्याधिकारी अद्यापही मिळालेला नाही. सध्या नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार येथील नायब तहसीलदार समशेर खा पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुलचेरा नगर पंचायतीअंतर्गत १४ व्या वित्त आयोगामधून शहरातील सर्व वॉर्डात घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे सप्टेंबर २०१८ पासून पूर्णत: बंद आहेत. परिणामी शहरातील सर्वच १७ वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वॉर्डातील नाल्यांची साफसफाई केली जात नाही. राणी दुर्गावती नगरात वॉर्डक क्र.६ मध्ये नाल्यांमध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नगर पंचायतीची स्थापना होऊन साडेतीन वर्ष उलटली. मात्र शहरात अद्यापही नगर पंचायतीच्या वतीने डम्पिंग यॉर्ड तयार करण्यात आले नाही. येथील मामा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी स्वच्छतेअभावी तलावात दुर्गंधी पसरली आहे. येथील मच्छी मार्केट हटविण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. घणकचरा व्यवस्थापन कामाचे आदेश एप्रिल २०१८ मध्ये संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले.संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्षात जून ते आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यात स्वच्छतेचे काम केले. मात्र त्यानंतर स्वच्छता व कचरा उचलण्याचे काम पूर्णत: बंद आहे.शहरातील नाली स्वच्छतेचे कंत्राट झाल्यानंतर नगर पंचायतीने सुधारित दर लागू केले. कमी दरामध्ये कंत्राटदार कामे करीत नसल्यामुळे स्वच्छतेचे काम सप्टेंबर २०१८ पासून बंद आहे. आता नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा असल्याने या सभेत पदाधिकारी कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करण्याबाबत निर्णय घेतील.- समशेर खा पठाण, प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत, मुलचेरा

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान