शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गडचिराेली शहरात टोमॅटो पाेहाेचले १०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपूर बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये किलाे दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली बाजारपेठेत टोमॅटोचे भाव १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत. आजपर्यंत एक किलाे टोमॅटो खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर केवळ पावभर टोमॅटो खरेदी करण्याची वेळ आली आहे. गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जाते. नागपुरात तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून भाजीपाल्याचा पुरवठा हाेते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात पूर आल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे नागपूर बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. एक महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये किलाे दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत. प्रत्येक भाजीत टोमॅटोचा वापर केला जाते. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढल्याबराेबर अनेकांचे बजेट बिघडले आहे.

गडचिराेली शहरातील भाजीपाल्याचे प्रतिकिलाे दरभाजीपाला    दरटोमॅटो    १००पत्ताकाेबी    ४०फूलकाेबी    ६०कारले    ६०वांगी    ४०कांदे    ५०सांबार    ८०आलू    ४०चवळी शेंगा    ६०

गडचिराेली शहरात प्रामुख्याने नागपूर येथून भाजीपाला आणला जातो. त्यामुळे नागपूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याच्या दरावर गडचिराेली शहरातील भाजीपाल्याचे दर अवंलबून आहेत. मागील तीन दिवसांपासून नागपूर बाजारपेठेतील टोमॅटोची आवक घटली असल्याने भाव वाढले आहेत. तसेच डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे टोमॅटोसह इतर भाजीपाला महाग झाला आहे. - जितेंद्र बाळेकरमकर, भाजीपाला व्यापारी

इंधनवाढीचा परिणामगडचिराेली शहर व जिल्ह्यात येणारा भाजीपाला शेकडाे किमी अंतरावरून वाहतूक करून आणला जाते. यासाठी माेठ्या प्रमाणात वाहतूक खर्च येताे. मागील काही दिवसांपासून डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक दरातही वाढ झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावर दिसून येत आहे.

जिल्ह्यातील पावसाने केल्या पालेभाज्या नष्ट

गडचिराेली जिल्ह्यात नाेव्हेंबर महिन्यात मेथी, पालक, सांबार, चवळीमाट, मुळा यांची लागवड केली हाेती. मात्र, आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पालेभाज्यांची राेपे नष्ट झाली आहेत. नाेव्हेंबर महिन्यात मेथी, पालक स्वस्त मिळण्यास सुरुवात हाेते. मात्र, उत्पादन कमी झाल्याने पालेभाज्या अजूनही महागच आहेत. 

 

टॅग्स :vegetableभाज्या