अहेरी : अहेरी राजनगरीत सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व वार्डात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर पंचायत प्रशासनाने शहरातील समस्या तत्काळ निकाली काढाव्यात या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, नाग विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी धडक दिली व नगर पंचायतीचे प्रशासक तथा अहेरीचे तहसीलदार एस. पुप्पलवार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.अहेरी शहरातील नाल्या उपस्याअभावी घाण पाणी व कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप व नाविसच्या कार्यकर्त्यांनी समस्यांबाबत नगर पंचायतीचे प्रशासक पुप्पलवार यांच्याशी चर्चा केली. शहरातील समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगर पंचायतीचे प्रशासक एस. पुप्पलवार व अहेरीचे नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.निवेदन देताना भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग, पप्पू मद्दीवार, सचिन पेदापल्लीवार, अमोल गुडल्लीवार, शंकर मगडीवार, मुकेश नामेवार, रमेश समुद्रालवार, मयूर गुम्मलवार, दिनेश जोशी, अशोक चांदेकर, श्रीनिवास चटारे, संतोष येमुलवार, मालूताई तोडसाम, साईनाथ औतकर, जावेद अली, भूषण शेकुर्तीवार आदी उपस्थित होते.
नगर पंचायतीवर नागरिकांची धडक
By admin | Updated: June 20, 2015 02:12 IST