शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

जिल्हाभर बंदला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:47 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली.

ठळक मुद्दे गडचिरोलीत निदर्शने व निषेध सभा : तालुका मुख्यालयी मोर्चे व घोषणाबाजी, शाळा-बसफेºयाही ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-कॉलेज आणि बसफेºयाही बंद राहिल्याने ९० टक्के व्यवहार ठप्प झाले होते. जिल्हाभरात कुठेही आंदोलनाने हिंसक वळण घेतले नाही.भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. बुधवार हा गडचिरोली शहरात बुधवारी बाजारपेठ बंद राहात असली तरी काही तुरळक व्यापारी दुकाने उघडतात. मात्र मोर्चानंतर त्यांनीही दुकाने बंद ठेवत आंदोलनकर्त्यांना सहकार्य केले.गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात सकाळी ८.३० वाजतापासून निदर्शने सुरू झाली. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेत काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, प्रभाकर बारापात्रे, फहीम शेख, जगन जांभुळकर, संजय कोचे, भारिप-बहुजन महासंघाचे रोहिदास राऊत, तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. त्यांनी या घटनेचा निषेध करताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. ११ वाजताच्या दरम्यान मोठ्या संख्येने जमलेल्या आंबेडकरी अनुयायांनी इंदिरा गांधी चौकात मानवी साखळी तयार करून काही वेळासाठी चारही बाजुंची वाहतूक रोखून धरली. यावेळी एसडीपीओ सागर कवडे, ठाणेदार संजय सांगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती हाताळली. दुपारी काही उत्साही युवक दुचाकींवरून फिरून रस्त्यालगत दुकान थाटून व्यवसाय करणाºया छोट्या दुकानदारांना बंदचे आवाहन करीत होते.कुरखेडा - कुरखेडा येथील बाजारपेठ बुधवारी पूर्ण दिवसभर बंद होती. युवकांनी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद सरदारे, संतोष खोब्रागडे, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, माजी जि.प. सदस्य अशोक इंदुरकर, भीमराव दहिवते, पुनेश वालदे, प्रमोद खोब्रागडे, यादव सहारे, गुड्डू वालदे, दयाराम खोब्रागडे, बालक भानारकर, संतोष राऊत, मनोज बोदेले, संघमित्रा ढवळे, पंचशीला सहारे, सविता जांभुळकर, सिंधू राऊत, लक्ष्मण नंदेश्वर, अशोक अंबादे, बंडू लाडे, प्रकाश उईके यांच्यासह समता सैनिक दल, महासभा महिला मंडळ तळेगाव, पंचशील नवयुवक मंडळ तळेगाव आदी उपस्थित होते. कुरखेडा तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या तळेगाव येथील पंचशील नवयुवक मंडळ, महामाया महिला मंडळ व समस्त बौद्ध समाज मंडळाच्या वतीने भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दुकाने व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले. पलसगड-कुरखेडा मार्गावर टायर पेटवून एक तास वाहतूक थांबविली. या आंदोलनाने कुठेही हिंसक वळण घेतले नाही. सायंकाळी काही ठिकाणी व्यवहार सुरू झाले.शाळकरी विद्यार्थ्यांचे हालसकाळपाळीत शाळा असणाºया काही शाळांमध्ये नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते. मात्र १० वाजतानंतर आंदोलकांच्या आवाहनानुसार शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान नागपूर, चंद्रपूरसह बाहेरगावाहून बसगाड्या येत नसल्यामुळे सुरक्षेच्या कारणातून गडचिरोली आगारानेही सकाळी १० नंतर बाहेरगावी जाणाºया बसफेºया बंद केल्या. त्यामुळे बाहेरगावावरून गडचिरोलीत दररोज येणे-जाणे करणाºया शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. बसफेºया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत बराच वेळपर्यंत या विद्यार्थ्यांना बस स्थानकावर ताटकळत राहावे लागले. अशीच परिस्थिती काही तालुकास्थळीही होती.बसपाची वेगळी चूलविविध राजकीय पक्षांच्या वतीने सकाळी इंदिरा गांधी चौकात धरणे व निषेध सभा झाली. हे आंदोलनकर्ते तेथून गेल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याच चौकात जमून सरकारविरोधी निदर्शने केली. काही वेळासाठी त्यांनी रास्ता रोकोही केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन भीमा कोरेगावच्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हा प्रभारी रमेश मडावी, प्रशांत दोनाडकर, ज्योती सोमनकर, कृष्णा वाघाडे, तुलराम दुधे, केशवराव सामृतवार, अरविंद गजभिये आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.