शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

धोकादायक विहिरीतून नागरिक भरतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:10 IST

तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवाघभूमीतील प्रकार : चिचोली ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.वाघभूमी येथे तीन सार्वजनिक विहिरी आहेत. यातील एका विहिरीचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. परंतु येथील विहिरीचे पाणी वापरताना नागरिकांनी अद्यापही वापरले नाही. विशेष म्हणजे विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीतील बांधकामाचे सेंट्रिंग अद्यापही काढण्यात आले नाही. उर्वरीत दोन विहिरीचे पाणी ग्रामस्थांची तहान भागतांना दिसून येत नाही. त्यामुळे गावातीलच नागरिक या विहिरीतील गाळ काढून आपली तहान भागवित आहेत. विहिरीच्या तोंडी लगतचा भाग पूर्णत: खचलेला असतानाही नागरिक येथील पाणी भरत आहेत. अजाणतेपणे पाय घसरल्यास येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच स्थितीत स्थानिकांना या विहिरीचे पाणी जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे. विशेष म्हणजे विहिरीवरील प्लॅटफार्मला तब्बल १० फुटाचे भगदाड पडले असून तब्बल पाच महिन्यांपासून याच जीवघेण्या विहिरीतील पाणी स्थानिकांना प्यावे लागत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. या विहिरीची दुरूस्ती न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातसुद्धा येथील नागरिकांना याच विहिरीतून पाणी काढावे लागणार आहे. पावसाळ्यात दलदल वाढून ओली माती जमिनीत दबण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या विहिरीच्या तोंडीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.