शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

धोकादायक विहिरीतून नागरिक भरतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:10 IST

तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवाघभूमीतील प्रकार : चिचोली ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.वाघभूमी येथे तीन सार्वजनिक विहिरी आहेत. यातील एका विहिरीचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. परंतु येथील विहिरीचे पाणी वापरताना नागरिकांनी अद्यापही वापरले नाही. विशेष म्हणजे विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीतील बांधकामाचे सेंट्रिंग अद्यापही काढण्यात आले नाही. उर्वरीत दोन विहिरीचे पाणी ग्रामस्थांची तहान भागतांना दिसून येत नाही. त्यामुळे गावातीलच नागरिक या विहिरीतील गाळ काढून आपली तहान भागवित आहेत. विहिरीच्या तोंडी लगतचा भाग पूर्णत: खचलेला असतानाही नागरिक येथील पाणी भरत आहेत. अजाणतेपणे पाय घसरल्यास येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच स्थितीत स्थानिकांना या विहिरीचे पाणी जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे. विशेष म्हणजे विहिरीवरील प्लॅटफार्मला तब्बल १० फुटाचे भगदाड पडले असून तब्बल पाच महिन्यांपासून याच जीवघेण्या विहिरीतील पाणी स्थानिकांना प्यावे लागत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. या विहिरीची दुरूस्ती न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातसुद्धा येथील नागरिकांना याच विहिरीतून पाणी काढावे लागणार आहे. पावसाळ्यात दलदल वाढून ओली माती जमिनीत दबण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या विहिरीच्या तोंडीची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.