शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

२० गावातील नागरिक घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही.

ठळक मुद्देकच्च्या घरात सुरू आहे आदिवासी कुटुंबीयांचे वास्तव्य; कोट्यवधीचा निधी येऊन विकास नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत ३९ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या वतीने सर्वसामान्य गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकूल योजना राबविली जाते. मात्र प्रशासकीय उदासीनता व ग्रा.पं.च्या दिरंगाईमुळे तालुक्यातील २० गावांतील बरेच कुटुंब घरकूल योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते.कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही. अहेरी तालुक्यातील कमलापूर हे नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील बऱ्याच गावांचा विकास अजून झाला नाही. दामरंचा, भंगारामपेठा, चिंतरेब, चिरवेली, मांडरा, पलाकास, मोदुमोडगू, आसा, नैनगुडम, मदागू, वेलगूर आदी भागात अद्यापही मूलभूत समस्या कायम आहेत. या गावातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अहेरी उपविभागाच्या विकासासाठी ठोस व प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.घराचे छत दुरूस्तीची लगबग वाढलीअहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये कच्चे घर असल्याने पावसाळा सुरू होताच घराची दुरूस्ती हाती घेतली जाते. अनेक नागरिक जंगलातून शिंद व गवत आणून त्याचे घरावर छत तयार करीत आहेत. या भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने घराच्या दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. वादळामुळे कित्येक घराच्या छतावरील कवेलू उडाले, विस्कळीत झाले. आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कवेलूची रचनाही योग्यरीत्या केली जात आहे.प्रशासनाचे नियोजन फेलस्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने योजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन केले जाते. घरकूल व इतर शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रा.पं. स्तरावर होते. मात्र अनेक कुटुंब घरकुलापासून वंचित असल्याने यंत्रणेचे नियोजन फेल आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना