शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

२० गावातील नागरिक घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही.

ठळक मुद्देकच्च्या घरात सुरू आहे आदिवासी कुटुंबीयांचे वास्तव्य; कोट्यवधीचा निधी येऊन विकास नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत ३९ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या वतीने सर्वसामान्य गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकूल योजना राबविली जाते. मात्र प्रशासकीय उदासीनता व ग्रा.पं.च्या दिरंगाईमुळे तालुक्यातील २० गावांतील बरेच कुटुंब घरकूल योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते.कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही. अहेरी तालुक्यातील कमलापूर हे नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील बऱ्याच गावांचा विकास अजून झाला नाही. दामरंचा, भंगारामपेठा, चिंतरेब, चिरवेली, मांडरा, पलाकास, मोदुमोडगू, आसा, नैनगुडम, मदागू, वेलगूर आदी भागात अद्यापही मूलभूत समस्या कायम आहेत. या गावातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अहेरी उपविभागाच्या विकासासाठी ठोस व प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.घराचे छत दुरूस्तीची लगबग वाढलीअहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये कच्चे घर असल्याने पावसाळा सुरू होताच घराची दुरूस्ती हाती घेतली जाते. अनेक नागरिक जंगलातून शिंद व गवत आणून त्याचे घरावर छत तयार करीत आहेत. या भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने घराच्या दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. वादळामुळे कित्येक घराच्या छतावरील कवेलू उडाले, विस्कळीत झाले. आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कवेलूची रचनाही योग्यरीत्या केली जात आहे.प्रशासनाचे नियोजन फेलस्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने योजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन केले जाते. घरकूल व इतर शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रा.पं. स्तरावर होते. मात्र अनेक कुटुंब घरकुलापासून वंचित असल्याने यंत्रणेचे नियोजन फेल आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना