शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

२० गावातील नागरिक घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही.

ठळक मुद्देकच्च्या घरात सुरू आहे आदिवासी कुटुंबीयांचे वास्तव्य; कोट्यवधीचा निधी येऊन विकास नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत ३९ ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या वतीने सर्वसामान्य गरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकूल योजना राबविली जाते. मात्र प्रशासकीय उदासीनता व ग्रा.पं.च्या दिरंगाईमुळे तालुक्यातील २० गावांतील बरेच कुटुंब घरकूल योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते.कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अनेक आदिवासी कुटुंब कुडाच्या घरात वास्तव्य करतात. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारले नाही. अहेरी तालुक्यातील कमलापूर हे नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील बऱ्याच गावांचा विकास अजून झाला नाही. दामरंचा, भंगारामपेठा, चिंतरेब, चिरवेली, मांडरा, पलाकास, मोदुमोडगू, आसा, नैनगुडम, मदागू, वेलगूर आदी भागात अद्यापही मूलभूत समस्या कायम आहेत. या गावातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अहेरी उपविभागाच्या विकासासाठी ठोस व प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.घराचे छत दुरूस्तीची लगबग वाढलीअहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये कच्चे घर असल्याने पावसाळा सुरू होताच घराची दुरूस्ती हाती घेतली जाते. अनेक नागरिक जंगलातून शिंद व गवत आणून त्याचे घरावर छत तयार करीत आहेत. या भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने घराच्या दुरूस्तीच्या कामाला वेग आला आहे. वादळामुळे कित्येक घराच्या छतावरील कवेलू उडाले, विस्कळीत झाले. आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कवेलूची रचनाही योग्यरीत्या केली जात आहे.प्रशासनाचे नियोजन फेलस्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने योजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन केले जाते. घरकूल व इतर शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रा.पं. स्तरावर होते. मात्र अनेक कुटुंब घरकुलापासून वंचित असल्याने यंत्रणेचे नियोजन फेल आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना