शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पेसा व वन अधिकारावर मंथन

By admin | Updated: December 19, 2015 01:25 IST

आदिवासी क्षेत्राची स्वतंत्रता व स्वायत्तता धोक्यात आहे. याकरिता आदिवासी क्षेत्रातील सर्व ग्रामसभांनी एकत्र येऊन आपले अधिकार ...

संघर्ष करण्याचा संकल्प : नऊ तालुक्यातील २९५ ग्रामसभांचे प्रतिनिधी व नागरिक हजरधानोरा : आदिवासी क्षेत्राची स्वतंत्रता व स्वायत्तता धोक्यात आहे. याकरिता आदिवासी क्षेत्रातील सर्व ग्रामसभांनी एकत्र येऊन आपले अधिकार व अस्तित्त्वासाठी संघर्ष करणे तसेच पेसा व वन अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गाव- गणराज्य निर्माण करण्याचा संकल्प गिरोलात बुधवारी आयोजित जिल्हास्तरीय ग्रामसभांच्या सभेत करण्यात आला. त्याबरोबरच विविध प्रश्नांवर मंथन सभेत करण्यात आले. या सभेला नऊ तालुक्यातील २९५ ग्रामसभांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. ग्रामसभा रेखाटोला, गिरोला, खुटगाव व दुधमाळा इलाक्यातील ग्रामसभांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले. आदिवासींचे अधिकार, वन संसाधनांचा योग्य वापर, लघु वन उपजांचे व मजुरीचे दर, पेसा व वन अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी व संसाधनाशी निगडीत बाबींवर चर्चा करण्यात आली. सभेत विविध प्र्रस्ताव मांडून ते पारित करण्यात आले.सभेत ग्रामसभांनी पारित केलेले ठरावजिल्हास्तरीय सभेत बांबू दर- लांब बांबू ६० रूपये, सुकलेला बांबू बंडल (२ मीटर) ८० रूपये, इतर बंडल १०० रूपये व प्रतिदिवस मजुरी २६० रूपये, ग्रामसभांना सामूहिक वन अधिकार मान्य करणे जिल्हा प्रशासनाचे कार्य आहे. यात आढळलेल्या चुका व प्रश्न सोडविणे. एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, कोरची तालुक्यातील प्रलंबित दावे त्वरित निकाली काढणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, पेसा संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्याकरिता चर्चा, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे तसेच गौण खनिजांच्या लिलावासंदर्भात ग्रामसभांना विश्वासात घेणे व त्यांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग देणे, जिल्ह्यातील माडिया गोंड व आदिम जमाती समुहाच्या वस्तीस्थानाचे अधिकार मान्य करणे, जिल्ह्यातील प्रस्तावित अभयारण्य व संरक्षित वनक्षेत्र रद्द करणे, लोकविरोधी खाण प्रकल्प रद्द करणे यासह विविध ठराव पारित करून प्रत राष्ट्रपती व राज्यपालांना पाठविली जाणार आहे.