शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

मेळघाटात बालमृत्यूचे थैमान

By admin | Updated: February 28, 2015 05:10 IST

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांत गेल्या १० महिन्यांत तब्बल ३०७ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक बाब

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांत गेल्या १० महिन्यांत तब्बल ३०७ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खोज या संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आणली आहे. एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यान ६ वर्षांखालील मृत पावलेल्या बालकांची ही संख्या आहे.संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत ५५४ बालमृत्यू झाले आहेत. त्यात १२ गैरआदिवासी तालुक्यांत एकूण २४७ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर मेळघाटातील केवळ दोन आदिवासी तालुक्यांत तब्बल ३०७ बालमृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. बालमृत्यूच्या एवढ्या भीषण परिस्थितीनंतरही मेळघाटाबाबत प्रशासन मात्र उदासीन असल्याचा आरोप संस्थेचे अ‍ॅड. बी एस साने यांनी गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.परिषदेत साने म्हणाले की, मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडे कोणतेही ठोस धोरण नाही. दरवर्षी आरोग्य मंत्री, आदिवासी मंत्री, प्रधान सचिव असे बडे नेते आणि अधिकारी मेळघाटाचा दौरा करतात. मात्र आदिवासींसाठी कोणतेही ठोस धोरण राबवले जात नाही. गेल्या १८ वर्षांत मेळघाटात १० हजार १६९ बालमृत्यू झाले आहेत. यावरून शासनाची मेळघाटाप्रती असलेली संवेदनशीलता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)