शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:02 IST

यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याचे क्षेत्र अधिक : जिल्हाभरात ३४ हजार ४१२ हेक्टरवर होणार पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात ३४ हजार ४१२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा बºयापैकी असल्याने या तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १० हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात रब्बी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गहू ७५५ हेक्टर, सूर्यफूल २५ हेक्टर, तीळ २ हजार ८५८ हेक्टर, ऊस १६० हेक्टर, हरभरा ३ हजार ८३० हेक्टर तसेच सर्वाधिक ६ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षी २०१६-१७ च्या हंगामात १०० टक्के क्षेत्रात रब्बी पिके गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आली होती.आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जमिनीची सुपिकता चांगली असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी आता धानपिकासोबतच रब्बी हंगामातील हरभरा व सूर्यफुलाच्या शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात गहू पिकाची पेरणीही बºयापैकी होत असते. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिके घेत आहेत.परतीच्या पावसाने हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान व इतर पिके अंतिम टप्प्यात असून ते निघण्याच्या स्थितीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू असून काही ठिकाणी मळणीही केली जात आहे. खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या जोरदार पावसाने पिकांना तडाखा दिला.या पावसामुळे शेतजमिनीमध्ये प्रचंड ओलावा निर्माण झाला आहे. परिणामी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी नांगरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकांचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अनेक शेतकºयांनी व्यक्त केली आहे. धान कापणीनंतर रब्बी पिकाच्या पेरणीस दरवर्षी वेग येत असतो.