शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:02 IST

यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याचे क्षेत्र अधिक : जिल्हाभरात ३४ हजार ४१२ हेक्टरवर होणार पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात ३४ हजार ४१२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा बºयापैकी असल्याने या तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १० हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात रब्बी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गहू ७५५ हेक्टर, सूर्यफूल २५ हेक्टर, तीळ २ हजार ८५८ हेक्टर, ऊस १६० हेक्टर, हरभरा ३ हजार ८३० हेक्टर तसेच सर्वाधिक ६ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षी २०१६-१७ च्या हंगामात १०० टक्के क्षेत्रात रब्बी पिके गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आली होती.आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जमिनीची सुपिकता चांगली असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी आता धानपिकासोबतच रब्बी हंगामातील हरभरा व सूर्यफुलाच्या शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात गहू पिकाची पेरणीही बºयापैकी होत असते. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिके घेत आहेत.परतीच्या पावसाने हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान व इतर पिके अंतिम टप्प्यात असून ते निघण्याच्या स्थितीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू असून काही ठिकाणी मळणीही केली जात आहे. खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या जोरदार पावसाने पिकांना तडाखा दिला.या पावसामुळे शेतजमिनीमध्ये प्रचंड ओलावा निर्माण झाला आहे. परिणामी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी नांगरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकांचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अनेक शेतकºयांनी व्यक्त केली आहे. धान कापणीनंतर रब्बी पिकाच्या पेरणीस दरवर्षी वेग येत असतो.