शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:02 IST

यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याचे क्षेत्र अधिक : जिल्हाभरात ३४ हजार ४१२ हेक्टरवर होणार पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात ३४ हजार ४१२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा बºयापैकी असल्याने या तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १० हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात रब्बी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गहू ७५५ हेक्टर, सूर्यफूल २५ हेक्टर, तीळ २ हजार ८५८ हेक्टर, ऊस १६० हेक्टर, हरभरा ३ हजार ८३० हेक्टर तसेच सर्वाधिक ६ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षी २०१६-१७ च्या हंगामात १०० टक्के क्षेत्रात रब्बी पिके गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आली होती.आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात जमिनीची सुपिकता चांगली असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी आता धानपिकासोबतच रब्बी हंगामातील हरभरा व सूर्यफुलाच्या शेतीकडे वळले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात गहू पिकाची पेरणीही बºयापैकी होत असते. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिके घेत आहेत.परतीच्या पावसाने हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान व इतर पिके अंतिम टप्प्यात असून ते निघण्याच्या स्थितीत आहेत. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू असून काही ठिकाणी मळणीही केली जात आहे. खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या जोरदार पावसाने पिकांना तडाखा दिला.या पावसामुळे शेतजमिनीमध्ये प्रचंड ओलावा निर्माण झाला आहे. परिणामी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी नांगरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकांचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अनेक शेतकºयांनी व्यक्त केली आहे. धान कापणीनंतर रब्बी पिकाच्या पेरणीस दरवर्षी वेग येत असतो.