शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

पेरमिली तालुक्यासाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:22 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.

ठळक मुद्देमूलभूत सोयी पुरवा : ३० गावातील नागरिकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कपेरमिली : स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.अहेरी उपविभाग विस्ताराने मोठा आहे. जिल्हा मुख्यालयात पोहोचण्यासाठी फार मोठे अंतर पार करावे लागते. परिणामी उपविभागात अनेक मूलभूत समस्या आहेत. पेरमिली परिसरसुद्धा यापासून सुटलेला नाही. या भागात वीज, रस्ते, आरोग्य, सिंचन, शिक्षण आदी बाबतीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अहेरीला जिल्ह्याचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून पेरमिलीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. चक्काजाम आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना व शासनाला पाठविण्यात आले.या निवेदनात पेरमिली येथे ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण करावे, सहकारी बँकेची शाखा स्थापन करावी, वरिष्ठ महाविद्यालय, आयटीआयची निर्मिती करावी, पेरमिली येथे महसूल मंडळ व नायब तहसीलदार कार्यालय द्यावे, ग्राहकांसाठी फोर-जी सेवा उपलब्ध करावी, शासकीय आश्रमशाळांतील रिक्त पदे भरावी, कचलेर व हिंदभट्टी येथे विद्युत पुरवठा करावा, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत आवश्यक गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित करावी आदी मागण्यांचा यात समावेश होता.आंदोलनस्थळी अहेरीचे नायब तहसीलदार घुये व महावितरण कंपनीचे प्रभारी अभियंता बावनथडे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले.या आंदोलनात पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच साजन गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत दुर्गे, आसिफ खान पठाण, डॉ. शंकर दुर्गे, कविश्वर चंदनखेडे, तुळशीराम चंदनखेडे, श्रीकांत बंडमवार, तुकेश कुंभारे, विनोद आत्राम, अमर गावडे, रवी औतकर, अमोल मारकवार व परिसराच्या ३० गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तर तीव्र आंदोलन करणारअनेक वर्षांपासून पेरमिली तालुक्याच्या निर्मितीसाठी आंदोलने करून निवेदने दिली जात आहेत. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी नागरिकांच्या वतीने देण्यात आला. बुधवारी जवळपास ७ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याच दिवशी भामरागडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Strikeसंप