शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पेरमिली तालुक्यासाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:22 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.

ठळक मुद्देमूलभूत सोयी पुरवा : ३० गावातील नागरिकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कपेरमिली : स्वतंत्र विदर्भ राज्य, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पेरमिली परिसरातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट होऊन बुधवारी पेरमिली येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.अहेरी उपविभाग विस्ताराने मोठा आहे. जिल्हा मुख्यालयात पोहोचण्यासाठी फार मोठे अंतर पार करावे लागते. परिणामी उपविभागात अनेक मूलभूत समस्या आहेत. पेरमिली परिसरसुद्धा यापासून सुटलेला नाही. या भागात वीज, रस्ते, आरोग्य, सिंचन, शिक्षण आदी बाबतीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अहेरीला जिल्ह्याचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासह स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून पेरमिलीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. चक्काजाम आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना व शासनाला पाठविण्यात आले.या निवेदनात पेरमिली येथे ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण करावे, सहकारी बँकेची शाखा स्थापन करावी, वरिष्ठ महाविद्यालय, आयटीआयची निर्मिती करावी, पेरमिली येथे महसूल मंडळ व नायब तहसीलदार कार्यालय द्यावे, ग्राहकांसाठी फोर-जी सेवा उपलब्ध करावी, शासकीय आश्रमशाळांतील रिक्त पदे भरावी, कचलेर व हिंदभट्टी येथे विद्युत पुरवठा करावा, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत आवश्यक गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित करावी आदी मागण्यांचा यात समावेश होता.आंदोलनस्थळी अहेरीचे नायब तहसीलदार घुये व महावितरण कंपनीचे प्रभारी अभियंता बावनथडे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले.या आंदोलनात पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच साजन गावडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत दुर्गे, आसिफ खान पठाण, डॉ. शंकर दुर्गे, कविश्वर चंदनखेडे, तुळशीराम चंदनखेडे, श्रीकांत बंडमवार, तुकेश कुंभारे, विनोद आत्राम, अमर गावडे, रवी औतकर, अमोल मारकवार व परिसराच्या ३० गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तर तीव्र आंदोलन करणारअनेक वर्षांपासून पेरमिली तालुक्याच्या निर्मितीसाठी आंदोलने करून निवेदने दिली जात आहेत. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी नागरिकांच्या वतीने देण्यात आला. बुधवारी जवळपास ७ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याच दिवशी भामरागडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Strikeसंप