शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सौरऊर्जेच्या माध्यमातून चपराळा अभयारण्य टँकरमुक्त

By admin | Updated: March 30, 2017 01:58 IST

उन्हाळ्यात उष्णतामान वाढत असल्याने माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही पाण्याची गरज अधिक भासत असते.

पंपाद्वारे पाणवठ्यात होत आहे पाणीपुरवठा : मुबलक प्रमाणात पाण्याची सोय झाल्याने प्राण्यांची संख्या वाढली सुधीर फरकाडे   आष्टी उन्हाळ्यात उष्णतामान वाढत असल्याने माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही पाण्याची गरज अधिक भासत असते. वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने वन विभागातर्फे यंदा येथील चपराळा अभयारण्यात पाणवठ्याजवळ बोरवेल खोदून त्यावर सौरप्लेट लावून पंपाद्वारे पाणवठ्यात पाणीपुरवठा केला जात आहे. चपराळा अभयारण्य टँकरमुक्त झाले आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने या अभयारण्यात प्राण्यांची संख्याही वाढत आहे. सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे अभयारण्यातील वीज पंप आपोओप सुरू होतो व सायंकाळ झाल्यावर सदर पंप बंद होतो. पाणीपुरवठा झाल्यावर पाणवठा ओव्हरफ्लो झाल्यानंतर येथील पाणी उतारावरून पडते. पाणवठ्यातील शुद्ध पाणी जनावरांसाठी उपलब्ध झाले आहे. खाली पडलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील प्राणी या चिखलात लोळत असतात. प्राण्याला जखम झाल्यास इतर प्राणी त्याचे चाखण व लोळवण करतात. येथील पाणवठ्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या अलिकडे वाढलेली आहे. चपराळा अभयारण्यात एक वाघ सोडल्यामुळे त्याचेही लोकेशन महिनाभरापूर्वी या ठिकाणी होते, अशी माहिती वन परिक्षेत्राधिकारी कैलुके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. जवळपास १६ पाणवठ्यांवर अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना थंड ठिकाणी राहण्यासाठी बांबुंच्या सहाय्याने नैसर्गिक व्यवस्था करण्याची संकल्पना साकारण्यात येणार आहे, असेही कैलुके यांनी सांगितले. १६ पंपातून भागते प्राण्यांची तहान वन विभागाच्या चौकीपासून लगाम व नागुलवाही गावाच्या सीमेपासून रेंगेवाहीपर्यंत एकूण १३४.७८ चौकिमी जागेत चपराळा अभयारण्य व्यापलेला आहे. या अभयारण्यात चितळ, हरिण, नीलगाय आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. या अभयारण्यामध्ये असलेल्या अन्य प्राण्यांना यापूर्वी टँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जात होता. मात्र गतवर्षीपासून १६ पंप बसवून सौरऊर्जेच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील प्राणी पाण्यासाठी आता रस्त्यावर अथवा गावाकडे येण्याची शक्यता दिसून येत नाही.