शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

पेसा ते नॉनपेसा बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:41 IST

जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : जि. प. शिक्षकांच्या पत्नींचे सीईओ व उपाध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या. तेव्हा शिक्षक आदेशाचे पालन करीत दुर्गम भागात सेवा देत होते. परंतु अनेक तालुक्यातील गावे पेसा कायद्यात मोडत असूनसुद्धा हेतू पुरस्सर या गावांना बदली प्रक्रियेतील अवघड क्षेत्राच्या गावांच्या यादीतून वगळण्यात आले. जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात पेसा गावात सेवा दिली व सध्या देत आहेत. अशा शिक्षकांवर या बदली प्रक्रियेमुळे दुर्गम भागातच राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होत आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया पेसा कायद्यानुसार पेसा ते नॉन पेसा करावी, अशी मागणी शिक्षकांच्या पत्नींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पेसा कायद्यानुसार दुर्गम गावांना अवघड क्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. विशेष बाब म्हणून जिल्ह्यात बदली प्रक्रिया पेसा कायद्यानुसार पेसा ते नॉन पेसा अशी पार पाडून जे शिक्षक पेसा गावात कार्यरत आहेत. त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक संबोधून बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली. पेसा क्षेत्रात मोडणाºया गावांना अवघड क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागात सेवा देणाºया शिक्षकांना अन्याय होणार आहे. यापूर्वीही दुर्गम भागात राहून शिक्षक सेवा देत होते. सध्या काही शिक्षक अजुनही सेवा देत आहेत. बºयाच कालावधीनंतर कुटुंब विशिष्ट ठिकाणी स्थायी झाले आहे. परंतु बदली प्रक्रियेमुळे कुटुंबापासून वेगळे राहण्याची वेळ आली आहे. परिणामी कुटुंबावर अन्याय होणार आहे. ज्याप्रमाणे पती-पत्नींना एकत्रीकरणाचा लाभ दिला जातो. त्याच धर्तीवर आम्हालाही एकत्रीकरणाचा लाभ देण्यात यावा, ज्या ठिकाणी निवासस्थान आहे व कुटुंब वास्तव्य करीत आहे त्यापासून ३० किमीपर्यंत शिक्षकांना बदलीचा लाभ द्यावा व नोकरीच्या इतर सेवेमध्ये देखील एकत्रीकरणाचा विचार करण्यात यावा अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा शिक्षकांच्या पत्नींनी दिला आहे. निवेदन देताना सुषमा दिवटे, कविता कुथे, शकिला सहारे, अस्मिता गायकवाड, रिजवाना खान, अश्विनी उईके, भारती दुधकुंवर, संगीता नंदेश्वर, इंदू पत्रे, रेखा पिल्लारे, संध्या बागडे, ललीता कोटगले, शालू मेश्राम, वर्षा कुथे, के. एम. साखरे, आर. के. चिमणकर, सिद्धार्थ दिवटे, राजेंद्र सहारे, नोहीद खान उपस्थित होते.