शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पेसा ते नॉनपेसा बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:41 IST

जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : जि. प. शिक्षकांच्या पत्नींचे सीईओ व उपाध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या. तेव्हा शिक्षक आदेशाचे पालन करीत दुर्गम भागात सेवा देत होते. परंतु अनेक तालुक्यातील गावे पेसा कायद्यात मोडत असूनसुद्धा हेतू पुरस्सर या गावांना बदली प्रक्रियेतील अवघड क्षेत्राच्या गावांच्या यादीतून वगळण्यात आले. जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात पेसा गावात सेवा दिली व सध्या देत आहेत. अशा शिक्षकांवर या बदली प्रक्रियेमुळे दुर्गम भागातच राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होत आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया पेसा कायद्यानुसार पेसा ते नॉन पेसा करावी, अशी मागणी शिक्षकांच्या पत्नींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पेसा कायद्यानुसार दुर्गम गावांना अवघड क्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. विशेष बाब म्हणून जिल्ह्यात बदली प्रक्रिया पेसा कायद्यानुसार पेसा ते नॉन पेसा अशी पार पाडून जे शिक्षक पेसा गावात कार्यरत आहेत. त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक संबोधून बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली. पेसा क्षेत्रात मोडणाºया गावांना अवघड क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागात सेवा देणाºया शिक्षकांना अन्याय होणार आहे. यापूर्वीही दुर्गम भागात राहून शिक्षक सेवा देत होते. सध्या काही शिक्षक अजुनही सेवा देत आहेत. बºयाच कालावधीनंतर कुटुंब विशिष्ट ठिकाणी स्थायी झाले आहे. परंतु बदली प्रक्रियेमुळे कुटुंबापासून वेगळे राहण्याची वेळ आली आहे. परिणामी कुटुंबावर अन्याय होणार आहे. ज्याप्रमाणे पती-पत्नींना एकत्रीकरणाचा लाभ दिला जातो. त्याच धर्तीवर आम्हालाही एकत्रीकरणाचा लाभ देण्यात यावा, ज्या ठिकाणी निवासस्थान आहे व कुटुंब वास्तव्य करीत आहे त्यापासून ३० किमीपर्यंत शिक्षकांना बदलीचा लाभ द्यावा व नोकरीच्या इतर सेवेमध्ये देखील एकत्रीकरणाचा विचार करण्यात यावा अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा शिक्षकांच्या पत्नींनी दिला आहे. निवेदन देताना सुषमा दिवटे, कविता कुथे, शकिला सहारे, अस्मिता गायकवाड, रिजवाना खान, अश्विनी उईके, भारती दुधकुंवर, संगीता नंदेश्वर, इंदू पत्रे, रेखा पिल्लारे, संध्या बागडे, ललीता कोटगले, शालू मेश्राम, वर्षा कुथे, के. एम. साखरे, आर. के. चिमणकर, सिद्धार्थ दिवटे, राजेंद्र सहारे, नोहीद खान उपस्थित होते.