शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारनियमनाच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:21 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल केला जात असून आता दररोज सकाळी ६ ते १०.४५ यावेळेतच भारनियमन करण्यात येणार आहे, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देखासदारांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल केला जात असून आता दररोज सकाळी ६ ते १०.४५ यावेळेतच भारनियमन करण्यात येणार आहे, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धानपीक शेवटच्या टप्प्यात असताना अखेरच्या पावसाने पाठ फिरविली. अशा स्थितीत अनेक शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने धानपिकाला वाचविण्याची धडपड करीत होते. मात्र भारनियमनामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत अडचण निर्माण झाली होती. सदर प्रश्नाबाबत आपण अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ही समस्या मांडली. त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून भारनियमनाच्या वेळेत बदल करून घेतल्याचे खा.नेते म्हणाले.गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात प्रामुख्याने धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या हातातून धानपीक जात आहे. शिवाय शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे भारनियमन बंद करण्यात यावे, अशा मागणीवजा तक्रारी व मागणीसुद्धा अनेक शेतकºयांनी आपल्याकडे केल्याचे खा.अशोक नेते यांनी यावेळी सांगितले.चर्चेदरम्यान ना.मुनगंटीवार यांनी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी लागलीच संपर्क साधला. त्यांनी सुरुवातीला महावितरणची अडचण सांगितली. मात्र ना.मुनगंटीवार यांनी आवश्यक तेवढा निधी व कोळसा आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ, मात्र दिवसा व रात्रीचे भारनियमन बंद करा, असे त्यांना सांगितले. दरम्यान ना.मुनगंटीवार यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व मुख्य सचिव तसेच कोळसा खाणीच्या अधिकाºयांशी चर्चा केली. त्यामुळे हा प्रश्न सुटला, असे नेते म्हणाले.पत्रपरिषदेला पं.स.उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, अविनाश पाल, श्रीकृष्ण कावणपुरे व प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीज