शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी मार्ग झाला अपघातप्रवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावे लागते.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी फलक नाही : खोदकामाचे नियोजन नसल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी-आष्टी महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली असून कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावे लागते. आवश्यक त्या ठिकाणी फलक किंवा रस्ता सुरक्षा रक्षक पर्याप्त प्रमाणात नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन पूर्णत: कोलमडले आहे.या मार्गाचे काम सुरू होऊन चार ते पाच महिने झाले परंतु कामाची गती संथ आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यावर दिवसातून पाच ते सहा वेळा पाणी मारणे आवश्यक आहे. पाणी मारले जात नसल्याने धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोरी बांधकाम सुरू असल्याने वाहनालकांना सुद्धा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोणत्याही एका बाजूने खोदकाम सुरू असते तर एक बाजू सुरळीत चालू शकली असती. परंतु कुठे एका बाजूने तर कुठे दुसºया बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. ज्या ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू आहे ती बाजू अरूंद असल्याने समोरासमोर वाहने आल्यास साईड देताना अडचण निर्माण होत आहे. तसेच ओव्हरटेक करणेही कठीण झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी फलक लावावे, अशी मागणी आहे.रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोकाचामोर्शी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा आदी तालुक्यांमधील बसगाड्या व इतर वाहने याच मार्गाने गडचिरोलीकडे येतात. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांची रात्रंदिवस वर्दळ राहते. रात्रीच्या सुमारासही वाहनांची ये-जा सुरूच राहते. रस्ता खोदून ठेवला आहे. तसेच फलक लावले नसल्याने वाहने खोदलेल्या रस्त्यात कोसळत आहेत. धूळ उड्याल्याने रात्रीच्या सुमारास समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे एकमेकांना वाहने धडक देण्याचे प्रमाणही वाढले आहे. योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक