शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच समस्यांचे आव्हान

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

जिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात

रत्नाकर बोमिडवार - चामोर्शीजिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात या तालुक्याचा विकास फारशाप्रमाणात झाला नाही. अनेक मूलभूत समस्या अद्यापही डोके वर काढून आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासमोर जुन्याच समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.चामोर्शी तालुक्यात बारमाही वाहणारी वैनगंगा नदी व इतर उपनद्या आहेत. धानाचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यात सुपीक क्षेत्रही भरपूर प्रमाणात आहे. परंतु या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही फारशी प्रगती करू शकला नाही. शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही सिंचनाच्या सोयी पोहोचल्या नाहीत. विदर्भाचा खजुराहो व दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडेश्वराच्या विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून मार्र्कंड्याचा विकास झाला नाही. त्यामुळे पर्यटन उद्योगाला अद्यापही चालना मिळाली नाही. धानक्षेत्र व पर्यटनाच्या भरवशावर या विभागाचा विकास होईल, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करीत होते. परंतु सदर अपेक्षा फोल ठरली आहे. राईस मिल उद्योगाशिवाय तालुक्यात कुठल्याही उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली नाही. बेरोजगारांच्या हाताला कामही नाही. धान उत्पादकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर वारंवार आर्थिक संकट कोसळत आहेत. आरोग्य सेवेच्याबाबतीत नवनिर्वाचित आमदार स्वत: वैद्यकीय अधीक्षक राहिल्याने त्यांच्याच ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार काय, असाही प्रश्न आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्याशिवाय आरोग्य सेवेत सुधारणा होणार नाही, अशी जनतेची भावना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाईचे भीषण सावट असते. अनेक किमी अंतरावरून महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागते. त्याबरोबरच चामोर्शी शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने चामोर्शीत १३२ केव्हीचे पॉवर हाऊस निर्माण करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच फिडर, डीपी अनेक ठिकाणी उभारण्याची गरज आहे. चामोर्शी-आष्टी, चामोर्शी-मूल हे दोनही रस्ते दुरवस्थेत आहेत. वाहनधारकांची हाडे खिळखिळी होतील, अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. याबरोबरच अनेक समस्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीचेही नवीन आमदारांसमोर आव्हान आहे.