शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

जुन्याच समस्यांचे आव्हान

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

जिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात

रत्नाकर बोमिडवार - चामोर्शीजिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात या तालुक्याचा विकास फारशाप्रमाणात झाला नाही. अनेक मूलभूत समस्या अद्यापही डोके वर काढून आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासमोर जुन्याच समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.चामोर्शी तालुक्यात बारमाही वाहणारी वैनगंगा नदी व इतर उपनद्या आहेत. धानाचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यात सुपीक क्षेत्रही भरपूर प्रमाणात आहे. परंतु या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही फारशी प्रगती करू शकला नाही. शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही सिंचनाच्या सोयी पोहोचल्या नाहीत. विदर्भाचा खजुराहो व दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडेश्वराच्या विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून मार्र्कंड्याचा विकास झाला नाही. त्यामुळे पर्यटन उद्योगाला अद्यापही चालना मिळाली नाही. धानक्षेत्र व पर्यटनाच्या भरवशावर या विभागाचा विकास होईल, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करीत होते. परंतु सदर अपेक्षा फोल ठरली आहे. राईस मिल उद्योगाशिवाय तालुक्यात कुठल्याही उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली नाही. बेरोजगारांच्या हाताला कामही नाही. धान उत्पादकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर वारंवार आर्थिक संकट कोसळत आहेत. आरोग्य सेवेच्याबाबतीत नवनिर्वाचित आमदार स्वत: वैद्यकीय अधीक्षक राहिल्याने त्यांच्याच ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार काय, असाही प्रश्न आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्याशिवाय आरोग्य सेवेत सुधारणा होणार नाही, अशी जनतेची भावना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाईचे भीषण सावट असते. अनेक किमी अंतरावरून महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागते. त्याबरोबरच चामोर्शी शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने चामोर्शीत १३२ केव्हीचे पॉवर हाऊस निर्माण करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच फिडर, डीपी अनेक ठिकाणी उभारण्याची गरज आहे. चामोर्शी-आष्टी, चामोर्शी-मूल हे दोनही रस्ते दुरवस्थेत आहेत. वाहनधारकांची हाडे खिळखिळी होतील, अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. याबरोबरच अनेक समस्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीचेही नवीन आमदारांसमोर आव्हान आहे.