शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:18 IST

निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देपाच दिवसात दुरुस्तीला सुरुवात करण्याचे आश्वासन : निजामाबाद-जगदलपूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : निजामाबाद-सिरोंचा-जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राज तुमनूर बसथांब्याजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.निजामाबाद-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्गा सिरोंचा तालुक्यातून जातो. सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा राज्यात कालेश्वराचे मंदिर आहे. तसेच तेलंगणाच्या वतीने मेडीगड्डा धरणाचे बांधकाम सुरू आहे. ही दोन्ही स्थळे पाहण्यासाठी अनेक नागरिक सिरोंचा तालुक्यात येतात. मात्र धर्मपुरी ते आसरअल्ली दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी व दुचाकी वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. महामार्गाच्या दुरूस्तीसाठी निवेदन देण्यात आले. मात्र मार्गाच्या दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ८ फेब्रुवारीला निवेदन देऊन १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने मार्ग दुरूस्तीबाबतची कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तुमनूर बसथांब्यावर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती.सिरोंचाचे प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. चार ते पाच दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले. अधिकाºयांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात काळीपिवळी वाहनचाकल, अ‍ॅटोचालक आदी उपस्थित होते. चार ते पाच दिवसांत मार्गाची दुरूस्ती न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.आंदोलनाला नवरदेवाचाही पाठिंबासकाळी ११ वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान वाहनांची मोठी रांग लागली होती. याचवेळी एक वरात लग्न कार्यासाठी जात होती. आंदोलनाचा फटका वरातीलाही बसला. आंदोलन संपेपर्यंत वरातीला थांबावे लागले. नवरदेवाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलनाला आपलाही पाठिंबा जाहीर केला.