शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

-तर चक्काजाम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:14 IST

एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभामरागडच्या समस्या सोडवा : एसडीएममार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. शासनस्तरावर अनेकदा मागणी करूनही तालुक्यातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या ६ सप्टेंबरपर्यंत विविध मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांच्या वतीने देण्यात आला.एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा शासनाविरूद्ध आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच निषेध म्हणून येथील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नायब तहसीलदार निखील सोनवने यांना निवेदन देताना त्रिवेणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष महेश कोंकमुट्टीवार, सचिव राजेंद्र कोठारे उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्याअहेरी उपविभागाच्या विकासासाठी अहेरी जिल्ह्याची निर्मिती करणे, पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करणे, भामरागड न.पं.अंतर्गत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करणे, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आलापल्लीवरून टॉवर लाईन टाकणे, वीज दर कमी करणे, बीएसएनएलची फोर-जी सेवा सुरू करून फ्रिक्वेंसी वाढविणे, आठवडी बाजारासाठी नवीन जागा देणे. बसस्थानक उभारणे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम