शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

१६०० हेक्टरवर तृणधान्याची लागवड

By admin | Updated: April 18, 2015 01:41 IST

खरीप हंगामात तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी शेकडो हेक्टर शेती धान पिकास मुकली.

सिरोंचा : खरीप हंगामात तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी शेकडो हेक्टर शेती धान पिकास मुकली. त्यामुळे खरीप हंगामातील भरपाई काढण्याकरिता रबी हंगामात तृणधान्य पिकाची लागवड केली. तालुक्यात १६२१ हेक्टरवर तृणधान्याची लागवड करण्यात आली. एकूण १०३ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात धानाची पूर्ण हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नव्हती. मात्र रबी हंगामात जिल्ह्यात तृणधान्य पिकाची १०३ टक्के क्षेत्रामध्ये पेरणी झाल्याने तृणधान्य पिकांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात साथ दिली आहे. रबी हंगामात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र पाच हजार हेक्टर आहे. त्यापैकी बाराही तालुके मिळून तीन हजार ९१८ हेक्टर क्षेत्रामध्ये रबी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. गव्हाच्या पिकांखालील सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ९० हेक्टर आहे. त्यापैकी ६३९.१० हेक्टर क्षेत्रामध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.रबी मका पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५१० हेक्टर आहे. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आल्याने तब्बल दोन हजार ३९.७५ हेक्टर क्षेत्रांपर्यंत मक्याची लागवड पोहोचली. ज्वारी, गहू आणि मका तसेच इतर तृणधान्य पिके मिळून जिल्ह्यात सहा हजार ६०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ६ हजार ८०१ क्षेत्रामध्ये तृणधान्य पेरणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय विचार करता सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १६२१ हेक्टर क्षेत्रामध्ये तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात २१०.३७ हेक्टर क्षेत्रात तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यात ७२६ हेक्टर, धानोरा ७५१.१० हेक्टर, मुलचेरा ४०५ हेक्टर, देसाईगंज २९० हेक्टर, आरमोरी २७४ हेक्टर, कुरखेडा ४७५ हेक्टर, कोरची २७० हेक्टर, अहेरी १२४७.३० हेक्टर, एटापल्ली ३७७.६० हेक्टर, व भामरागड तालुक्यात १५३.५ हेक्टर क्षेत्रामध्ये ज्वारी, गहू, मका व इतर तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसाचा काही प्रमाणात ज्वारी, गहू व मका तसेच अन्य तृणधान्य पिकास फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात ज्वारी पिकाखालील क्षेत्रामध्ये घट होत आहे. केवळ जिल्ह्याच्या दक्षिण भागात सिरोंचा तालुक्यात ज्वारी पिकाची लागवड जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)