शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

वर्षभरातच पाथरगोटा येथील सिमेंट बंधारा तडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

जाेगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील नाल्यावर जून २०२०मध्ये बांधकाम केलेला सिमेंट काँक्रीटचा बंधारा एका वर्षात तुटल्यामुळे सिंचाई विभाग ...

जाेगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील नाल्यावर जून २०२०मध्ये बांधकाम केलेला सिमेंट काँक्रीटचा बंधारा एका वर्षात तुटल्यामुळे सिंचाई विभाग व कंत्राटदाराच्या बांधकाम कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे.

जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद उपविभाग देसाईगंज या यंत्रणेकडून जून २०२० मध्ये १३ लाख रुपये खर्चातून पाथरगाेटा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाच्या साहित्याने करण्यात आले. बांधकामासाठी २० टक्के काळी गिट्टी व ८० टक्के डोंगरगाव येथील पांढरी गिट्टी वापरण्यात आली. तसेच अत्यल्प सिमेंट व लोखंडाचा वापर करण्यात आला. जवळच्या नाल्यावरील मातीमिश्रित चोरलेल्या रेतीचा वापर करण्यात आला. एक वर्षापूर्वीच बंधाऱ्याच्या भिंती तडकल्या आहेत. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भेगा पडल्या आहेत. बंधाऱ्याचे खोलीकरण न केल्यामुळे बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कुठेच दिसून येत नाही. मग १३ लाख रुपये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बंधारा उभा करण्यात संपले काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडत आहे. अनेक वर्षांपासून एकाच शाखेत काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे.

आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी मिळाला असल्याने या बंधाऱ्याचे बांधकाम ५० टक्के आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी असलेल्या ठिकाणी करायचे हाेते. बंधारा बांधकामाचे ठिकाण बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत, ग्रामसभेत प्रस्ताव पारित करून योग्य ठिकाणाची निवड करायची हाेती. मात्र अशी कुठलीही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. आदिवासी प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याची जमीन नसलेल्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे २०० मीटर अंतरावर अगाेदरच अस्तित्वात असलेल्या दाेन बंधाऱ्यांच्या मध्ये नवीन बंधारा बांधण्यात आला. तीनही बंधारे एकाच नाल्यावर, एकाच ठिकाणी का बांधण्यात आले असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कातील योजनेच्या बंधाऱ्याची चोरी करून चुकीच्या ठिकाणी आर्थिक स्वार्थापोटी निकृष्ट दर्जाचा सिमेंट काँक्रीट बंधारा बांधला. याची सखोल चौकशी करून बिल काढणाऱ्या अधिकारी व बांधकाम कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी व इतर शेतकरी नागरिकांकडून करण्यात येत आहे.