शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वर्षभरातच पाथरगोटा येथील सिमेंट बंधारा तडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

जाेगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील नाल्यावर जून २०२०मध्ये बांधकाम केलेला सिमेंट काँक्रीटचा बंधारा एका वर्षात तुटल्यामुळे सिंचाई विभाग ...

जाेगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील नाल्यावर जून २०२०मध्ये बांधकाम केलेला सिमेंट काँक्रीटचा बंधारा एका वर्षात तुटल्यामुळे सिंचाई विभाग व कंत्राटदाराच्या बांधकाम कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे.

जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद उपविभाग देसाईगंज या यंत्रणेकडून जून २०२० मध्ये १३ लाख रुपये खर्चातून पाथरगाेटा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाच्या साहित्याने करण्यात आले. बांधकामासाठी २० टक्के काळी गिट्टी व ८० टक्के डोंगरगाव येथील पांढरी गिट्टी वापरण्यात आली. तसेच अत्यल्प सिमेंट व लोखंडाचा वापर करण्यात आला. जवळच्या नाल्यावरील मातीमिश्रित चोरलेल्या रेतीचा वापर करण्यात आला. एक वर्षापूर्वीच बंधाऱ्याच्या भिंती तडकल्या आहेत. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भेगा पडल्या आहेत. बंधाऱ्याचे खोलीकरण न केल्यामुळे बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कुठेच दिसून येत नाही. मग १३ लाख रुपये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बंधारा उभा करण्यात संपले काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडत आहे. अनेक वर्षांपासून एकाच शाखेत काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे.

आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी मिळाला असल्याने या बंधाऱ्याचे बांधकाम ५० टक्के आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी असलेल्या ठिकाणी करायचे हाेते. बंधारा बांधकामाचे ठिकाण बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत, ग्रामसभेत प्रस्ताव पारित करून योग्य ठिकाणाची निवड करायची हाेती. मात्र अशी कुठलीही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. आदिवासी प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याची जमीन नसलेल्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे २०० मीटर अंतरावर अगाेदरच अस्तित्वात असलेल्या दाेन बंधाऱ्यांच्या मध्ये नवीन बंधारा बांधण्यात आला. तीनही बंधारे एकाच नाल्यावर, एकाच ठिकाणी का बांधण्यात आले असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कातील योजनेच्या बंधाऱ्याची चोरी करून चुकीच्या ठिकाणी आर्थिक स्वार्थापोटी निकृष्ट दर्जाचा सिमेंट काँक्रीट बंधारा बांधला. याची सखोल चौकशी करून बिल काढणाऱ्या अधिकारी व बांधकाम कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी व इतर शेतकरी नागरिकांकडून करण्यात येत आहे.