शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

नाला बांधकामाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:13 IST

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.

ठळक मुद्देरोवणी केलेले धान पीक वाहून गेले : जिमलगट्टानजीकच्या किष्टापुरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.किष्टापूर येथील मुत्ता मदन सिडाम व मलय्या मदना सिडाम या शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धान पिकाची रोवणी केली होती. ही शेती पूर्णपणे पाण्याखाली आल्याने त्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे. माती नाला बांधकाम करताना अतिरिक्त पाणी जाण्यासाठी सुविधा करणे आवश्यक होते. मात्र या नाल्याला वेस्टवेअर दिला नाही. त्यामुळे या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन शेतकºयांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, सिंचन व वन विभागामार्फत कोट्यवधी रूपयांची कामे केली जातात. या कामासाठी शासनाकडून संबंधित विभागाला वार्षिक उद्दिष्ट प्राप्त होत असते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने अधिकारी नियोजन शुन्यतेने नाला व इतर बांधकाम करतात, हे या कामावरून दिसून येत आहेत. या बाबीची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाºयांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केले बांधकामकृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी व लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता माती नाला बांधकाम केले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे.