शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

नाला बांधकामाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:13 IST

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.

ठळक मुद्देरोवणी केलेले धान पीक वाहून गेले : जिमलगट्टानजीकच्या किष्टापुरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.किष्टापूर येथील मुत्ता मदन सिडाम व मलय्या मदना सिडाम या शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धान पिकाची रोवणी केली होती. ही शेती पूर्णपणे पाण्याखाली आल्याने त्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे. माती नाला बांधकाम करताना अतिरिक्त पाणी जाण्यासाठी सुविधा करणे आवश्यक होते. मात्र या नाल्याला वेस्टवेअर दिला नाही. त्यामुळे या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन शेतकºयांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, सिंचन व वन विभागामार्फत कोट्यवधी रूपयांची कामे केली जातात. या कामासाठी शासनाकडून संबंधित विभागाला वार्षिक उद्दिष्ट प्राप्त होत असते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने अधिकारी नियोजन शुन्यतेने नाला व इतर बांधकाम करतात, हे या कामावरून दिसून येत आहेत. या बाबीची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाºयांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केले बांधकामकृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी व लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता माती नाला बांधकाम केले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे.