गडचिरोली : ग्रामीण पायाभूत विकास निधी नाबार्ड सहाय्यातून मेघा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत राज्यासह जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रांना सुधारित मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व भामरागड या दुर्गम तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने १२ मे २0१४ रोजी नवा शासन निर्णय काढून नाबार्ड अर्थसहाय्यातून मेघा पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट क्षेत्र विकसीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. यानुसार एटापल्ली तालुक्यातील ७८४0.0३ व भामरागड तालुक्यातील २0९३.९0 पाणलोट क्षेत्र विकसीत करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण पायाभूत विकास निधीतून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाकडे सदर क्षेत्र वर्ग करण्यात येणार आहे. भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा आणि एमआरएसएसी यांनी घोषीत केलेल्या राज्यातील १ हजार ५0५ पाणलोटांपैकी गरजेनुसार प्रत्येक जिल्ह्यातून चार असे एकूण १३२ मेघा पाणलोट आरआयडीएफ अंतर्गत नाबार्डमार्फत उपलब्ध होणार्या निधीतून विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान केंद्र शासनाच्यावतीने सन २00९-१0 पासून एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम राज्यासाठी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पाच बॅचमध्ये आतापर्यंत ५७३६.९७ किंमतीचे एकूण १ हजार ४९ प्रकल्प करण्यात आले असून यांतर्गत ४५.२१ लक्ष हेक्टर क्षेत्र विकसीत होणार आहे. नाबार्डची मान्यता मिळालेल्या प्रकल्पातून अहवाल शासनाकडे प्रशासनाला पाठवायचे आहे. पाणलोटातून दोन तालुक्याला न्याय मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पाणलोट क्षेत्र विकसित होणार
By admin | Updated: May 13, 2014 23:36 IST