शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची

By admin | Updated: May 7, 2014 02:13 IST

वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची

 : वनरक्षकांच्या ३७ पदांकरिता ११,५४७ उमेदवार मैदानात भरतीसाठी उमेदवारांचे जत्थे दाखल

 गडचिरोली/देसाईगंज/आलापल्ली : वनविभागातील गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे़ वनरक्षकाच्या ३७ पदासाठी ११ हजार ५४७ उमेदवार पात्र ठरले आहेत़ शारीरिक पात्रतेची कस काढण्यासाठी गोंदिया, भंडारा, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांनी गडचिरोली, देसाईगंज व आलापल्ली येथे गर्दी केली असून युवकांचे जत्थे जिल्ह्यात दाखल झाले आहे. वनरक्षकाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेकरीता लगतच्या जिल्ह्यातील युवक देसाईगंज, गडचिरोली व आलापल्ली येथे आले आहेत. गडचिरोली वनवृत्तासाठी जिल्ह्यात वनरक्षकांच्या ३७ पदासाठी भरती होत आहे. मात्र या पदासाठी ११ हजार ५४७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रियापूर्णपणे आॅनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे़ देसाईगंज व गडचिरोली येथे ६ ते १० मे पर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

तर आलापल्ली येथे ६ ते ७ मे दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येईल़ एकुण अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी ४ हजार ६९२ उमेदवारांची शारीरिक पात्रता परीक्षा वडसा वनविभागांतर्गत घेण्यात येईल़ उमेदवारांना सोयीचे होण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय उमेदवारांचे दिवस ठरविण्यात आले आहेत़ ५ दिवस चालणार्‍या भरती प्रक्रियेसाठी वनविभागाने पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली आहे़ ५ दिवस चालणार्‍या भरती प्रक्रियेत वडसा वनविभागाने उन्हाचा तडाखा पाहून उमेदवारांच्या सोयीकरीता पाणी, सावलीसाठी मंडपाची व्यवस्था केली आहे़

गडचिरोली व आलापल्ली येथेही भरतीसाठी वनविभागाने जय्यत तयारी केली आहे. आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) उमेदवारांची दमछाक; अनेक उमेदवार वंचित ४देसाईगंज रेल्वे व बस स्थानकापासून वनविभागाच्या पदभरती प्रक्रियेचे ठिकाण जवळपास ४ किमी अतंरावर आहे़ शहरात अंतर्गत वाहतूकीसाठी आॅटोची सोय नाही़ त्यामुळे बाहेरगावावरून येणार्‍या उमेदवारांनी शारीरीक परीक्षेपुर्वीच ठिकाणावर पोहचण्यासाठी क्षमता सिध्द करावी लागत आहे़ ४वनविभागाने भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविले. ४ मे रोजी शासकीय सुटी आल्याने अनेक उमेदवारांना अर्ज करता आले नाही. यामुळे वेळेअभावी उमेदवारांना वंचित राहावे लागले.