शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कॉलड्रॉपने मोबाईलधारक त्रस्त

By admin | Updated: February 8, 2016 01:31 IST

बीएसएनएलच्या गडचिरोली शहरातील ग्राहकांना मागील १५ दिवसांपासून कॉलड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

आवाजच येत नाही : मागील १५ दिवसांपासून निर्माण झाली समस्यागडचिरोली : बीएसएनएलच्या गडचिरोली शहरातील ग्राहकांना मागील १५ दिवसांपासून कॉलड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मध्येच फोन कटण्याबरोबरच आवाज न येण्याची नवीनच समस्या निर्माण झाली आहे. मात्र याकडे बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बीएसएनएलने संपूर्ण जिल्हाभरात मोबाईल टॉवरचे जाळे निर्माण केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातही मोबाईल टॉवर बांधण्यात आले आहेत. इतर खासगी कंपन्या मात्र केवळ तालुक्याच्या ठिकाणीच सेवा देत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे. शहरी भागातही बीएसएनएलचेच सर्वाधिक ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या विविध योजनांमुळे ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत मोबाईल टॉवरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मात्र मोबाईल टॉवर व त्यांची क्षमता आहे, तेवढीच कायम आहे. परिणामी सध्या कार्यरत यंत्रणेवर लोड पडत असल्याने कॉलड्रॉपची संख्या वाढत चालली आहे. पहिल्यांदा फोन केल्यानंतर सदर फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे तर कधी स्वीच आॅफ असल्याचे सांगते. दोन ते तीनदा प्रयत्न केल्यानंतर फोन लागते. मात्र मध्येच फोन कटत असल्याने आणखी दुसऱ्यांदा फोन लावावा लागतो. ही सर्व कारणे बीएसएनएलच्या ग्राहकांना नित्याचीच झाली आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून दोघापैकी एका मोबाईलधारकाचा आवाजच न येण्याची नवीनच समस्या निर्माण झाली आहे. एका व्यक्तीचा आवाज स्पष्ट येत असला तरी दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येत नाही. त्यामुळे शेवटी फोन बंद करून पुन्हा लावावा लागतो. या सर्व भानगडीमध्ये ग्राहकांचे बरेच पैसे खर्च होत आहेत व त्याचा अनावश्यक भुर्दंड ग्राहकांना उचलावा लागत आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)कॉम्प्लेक्स परिसरात थ्री-जी नावापुरतीचगडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात बीएसएनएलने थ्री-जी यंत्रणा बसविली आहे. मात्र या परिसरात थ्री-जी सेवेची स्पीड मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. अनेक युवक इंदिरा गांधी चौकात येऊन मोबाईलचा वापर करताना दिसत आहेत. थ्री-जी यंत्रणेच्या नावावर बीएसएनएलने लूट चालविली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बीएसएनएलच्या वतीने जिल्हाभरात एका वर्षात २०० च्या वर टॉवर उभारले आहेत. मात्र सदर टॉवरसुध्दा व्यवस्थित काम करीत नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे बीएसएनएलने गंभीरतेने लक्ष देऊन त्यातील बिघाड दुरूस्त करण्याची मागणी आहे.