शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कॉलड्रॉपने मोबाईलधारक त्रस्त

By admin | Updated: February 8, 2016 01:31 IST

बीएसएनएलच्या गडचिरोली शहरातील ग्राहकांना मागील १५ दिवसांपासून कॉलड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

आवाजच येत नाही : मागील १५ दिवसांपासून निर्माण झाली समस्यागडचिरोली : बीएसएनएलच्या गडचिरोली शहरातील ग्राहकांना मागील १५ दिवसांपासून कॉलड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मध्येच फोन कटण्याबरोबरच आवाज न येण्याची नवीनच समस्या निर्माण झाली आहे. मात्र याकडे बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बीएसएनएलने संपूर्ण जिल्हाभरात मोबाईल टॉवरचे जाळे निर्माण केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातही मोबाईल टॉवर बांधण्यात आले आहेत. इतर खासगी कंपन्या मात्र केवळ तालुक्याच्या ठिकाणीच सेवा देत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे. शहरी भागातही बीएसएनएलचेच सर्वाधिक ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या विविध योजनांमुळे ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत मोबाईल टॉवरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मात्र मोबाईल टॉवर व त्यांची क्षमता आहे, तेवढीच कायम आहे. परिणामी सध्या कार्यरत यंत्रणेवर लोड पडत असल्याने कॉलड्रॉपची संख्या वाढत चालली आहे. पहिल्यांदा फोन केल्यानंतर सदर फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे तर कधी स्वीच आॅफ असल्याचे सांगते. दोन ते तीनदा प्रयत्न केल्यानंतर फोन लागते. मात्र मध्येच फोन कटत असल्याने आणखी दुसऱ्यांदा फोन लावावा लागतो. ही सर्व कारणे बीएसएनएलच्या ग्राहकांना नित्याचीच झाली आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून दोघापैकी एका मोबाईलधारकाचा आवाजच न येण्याची नवीनच समस्या निर्माण झाली आहे. एका व्यक्तीचा आवाज स्पष्ट येत असला तरी दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येत नाही. त्यामुळे शेवटी फोन बंद करून पुन्हा लावावा लागतो. या सर्व भानगडीमध्ये ग्राहकांचे बरेच पैसे खर्च होत आहेत व त्याचा अनावश्यक भुर्दंड ग्राहकांना उचलावा लागत आहे. हा बिघाड दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)कॉम्प्लेक्स परिसरात थ्री-जी नावापुरतीचगडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात बीएसएनएलने थ्री-जी यंत्रणा बसविली आहे. मात्र या परिसरात थ्री-जी सेवेची स्पीड मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. अनेक युवक इंदिरा गांधी चौकात येऊन मोबाईलचा वापर करताना दिसत आहेत. थ्री-जी यंत्रणेच्या नावावर बीएसएनएलने लूट चालविली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बीएसएनएलच्या वतीने जिल्हाभरात एका वर्षात २०० च्या वर टॉवर उभारले आहेत. मात्र सदर टॉवरसुध्दा व्यवस्थित काम करीत नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे बीएसएनएलने गंभीरतेने लक्ष देऊन त्यातील बिघाड दुरूस्त करण्याची मागणी आहे.