शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कैकाडी वस्तीला विकासाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:38 IST

चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देवीज, रस्ता, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव : नगर परिषदेचे मागील सात वर्षांपासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.कैकाडी समाजाचे नागरिक शहरात कुठेही वास्तव्याने राहत होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने यांनी पुढाकार घेत चामोर्शी मार्गावर शहरापासून काही दूर अंतरावर कैकाडी समाजातील नागरिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या समाजाच्या नागरिकांनी त्या ठिकाणी झोपड्या उभ्या केल्या. ही वस्ती वसल्याला जवळपास सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र गडचिरोली नगर परिषदेने साधा वीज पुरवठा, नाली, रस्ता यासारख्या मूलभूत सोयीसुविधा सुध्दा उपलब्ध करून दिल्या नाहीत. वस्तीच्या दोन्ही बाजुला घरे आहेत. वस्तीतील मध्यभागी असलेल्या मार्गाचे केवळ माती वजा खडीकरण करण्यात आले आहे. या मार्गाचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण झाले नाही. रस्त्याच्या बाजुला नाली बांधण्यासाठी खोदकाम झाले आहे. मात्र नाली बांधली नाही. रस्ता उंच करण्यासाठी नालीप्रमाणे खोदकाम करण्यात आले असावे, अशी शक्यता आहे. वीज नसल्याने रात्र अंधारातच काढावी लागते. येथील नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने काही नागरिकांनी साध्या ताडपत्री अंथरून तर काही नागरिकांनी टिन टाकून झोपड्या तयार केल्या आहेत. या वस्तीत जाण्यासाठी रस्ता नसून पायवाटेने जावे लागते. वस्तीच्या बाहेर शेतात जुनी खासगी विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावर सदर कुटुंब आपली तहाण भागवित आहेत.गडचिरोली नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. यातीलकाही निधी चांगली नाली फोडून त्यावर दुसरी नाली बांधण्यासाठी खर्च केला जातो. मानवी दृष्टीकोन लक्षात घेऊन येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.निवडणुकीच्या वेळीच फिरकतात उमेदवारकैकाडी वस्तीतील मते मिळावी यासाठी नगर परिषद निवडणुकीसाठी उभे राहत असलेले उमेदवार वस्तीत जाऊन मते मागतात. वस्तीचा विकास करण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर मात्र नगरसेवकांना या वस्तीचा विसर पडतो. वन विभागाच्या जागेवर सदर घरे असल्याने योजना राबविता येत नाही. असे सांगितले जाते. मात्र इतर वार्डांप्रमाणेच याही वार्डात योजना राबविणे शक्य आहे.