शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बसेस होतात पंक्चर

By admin | Updated: October 1, 2014 23:22 IST

भामरागड तालुक्यातील अनेक डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडल्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात मार्गावर घडत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या

भामरागड : भामरागड तालुक्यातील अनेक डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडल्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात मार्गावर घडत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस दररोज पंक्चर होत असल्याचे दिसून येते. यामुळे बसमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान रस्त्यावरच पंक्चर झालेले बसचे चाक रस्त्यावर बदलविण्याची पाळी अनेकदा बसच्या चालकावर येत असते. यामुळे बसफेरीचे वेळापत्रकही पूर्णत: कोलमडले आहे.मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरील लहान खड्ड्यांचे मोठ्या खड्ड्यात रूपांतर झाले आहे. काही ठिकाणी अर्ध्यापेक्षाही जास्त रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. अतिवृष्टीमुळे पेरमिली-भामरागड-लाहेरी तसेच भामरागड-कोठी-ताडगाव-मन्नेराजाराम या मार्गाची पूर्णत: दूरवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरापासून भामरागड तालुक्यातील अनेक डांबरीकरण मार्ग तसेच कच्चे रस्ते पूर्णत: उखडले आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांचे अनेकदा अपघात घडले आहे. या अपघातात काही नागरिक जखमी झाले होते. तीन दिवसापूर्वी भामरागड तालुक्यातील कोठी आश्रमशाळेचा विद्यार्थी गंभीर आजारी पडला. कोठी येथे प्राथमिक आरोग्य पथक आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टर नाही. सदर आजारी विद्यार्थ्याला भामरागड तालुका मुख्यालयी उपचाराकरिता आणण्यासाठी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोणीही खासगी वाहन द्यायला तयार होत नव्हते. त्यामुळे आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापकांना अधिकचे पैसे देऊन आजारी विद्यार्थ्यावर भामरागड येथे उपचार केले. अशा प्रकारची अत्यंत बिकट परिस्थिती संपूर्ण तालुक्यात आहे. गडचिरोली-भामरागड-लाहेरी, अहेरी-लाहेरी-भामरागड-कोठी, भामरागड-हिदूर, भामरागड-मन्नेराजाराम या मार्गाने महामंडळाच्या बसेस धावतात. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बसचालकाला वाहन चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. एका आठवड्यामध्ये दोन ते तीन बसेस पंक्चर होतात, ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भामरागड तालुक्यातील बसवाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)