शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

बसस्थानक व पाणी समस्येने धानोरावासीय त्रस्त

By admin | Updated: January 13, 2015 22:59 IST

६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही.

अल्लाउद्दीन लालानी - धानोरा६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीची सध्या असलेली पाणी पुरवठा योजना ही २५ ते ३० वर्षांपूर्वीची आहे. ती नादुरूस्त अवस्थेतच आहे. त्यात बिघाड आल्यावर ग्रामपंचायतीकडून आठ- आठ दिवस नळयोजना दुरूस्तीसाठी लागतात. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा खंडित होऊन जातो. गावाची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी लक्षात घेऊन नवीन पाच कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्ताव ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविला. ही पाणी पुरवठा योजना वराती डोहावर उभारली जाणार होती. यात जलशुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र हा प्रस्ताव सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. धानोरा नगर पंचायत झाल्यानंतर हा प्रस्ताव मार्गी लागेल, अशी माहिती सध्या देण्यात येत आहे. गावालगत तुलावीटोला, गोमाटोला, जांगीटोला, आतलाटोला या नव्या वस्ती बसविण्यात आल्या आहे. मात्र या भागाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांना शेतीच्या रस्त्यातूनच जावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून येथे रस्ता तयार करण्यात येणार होता. मात्र हे काम प्रलंबित पडून आहे. पूर्वी हेटी धानोऱ्याचा भाग होता. ६०० लोकसंख्या असलेल्या या गावाला आता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. धानोरा ग्रामपंचायती अंतर्गत आठवडी बाजार भरतो. मात्र येथे ओट्यांची संख्या वाढविण्यात आलेली नाही. या बांधकामाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच गावात बीपीएल यादीचे सर्वेक्षणही व्यवस्थित झाले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, असे नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. वन जमिनीचे पट्टेही वाटपही रखडलेले आहे.या भागात भारत संचार निगमची एकमेव दूरसंचार सेवा आहे. वीज जाताच ही सेवा खंडित होते. मोबाईलधारक नागरिक त्रस्त आहेत. या समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.