शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

बसस्थानक व पाणी समस्येने धानोरावासीय त्रस्त

By admin | Updated: January 13, 2015 22:59 IST

६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही.

अल्लाउद्दीन लालानी - धानोरा६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीची सध्या असलेली पाणी पुरवठा योजना ही २५ ते ३० वर्षांपूर्वीची आहे. ती नादुरूस्त अवस्थेतच आहे. त्यात बिघाड आल्यावर ग्रामपंचायतीकडून आठ- आठ दिवस नळयोजना दुरूस्तीसाठी लागतात. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा खंडित होऊन जातो. गावाची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी लक्षात घेऊन नवीन पाच कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्ताव ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविला. ही पाणी पुरवठा योजना वराती डोहावर उभारली जाणार होती. यात जलशुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र हा प्रस्ताव सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. धानोरा नगर पंचायत झाल्यानंतर हा प्रस्ताव मार्गी लागेल, अशी माहिती सध्या देण्यात येत आहे. गावालगत तुलावीटोला, गोमाटोला, जांगीटोला, आतलाटोला या नव्या वस्ती बसविण्यात आल्या आहे. मात्र या भागाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांना शेतीच्या रस्त्यातूनच जावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून येथे रस्ता तयार करण्यात येणार होता. मात्र हे काम प्रलंबित पडून आहे. पूर्वी हेटी धानोऱ्याचा भाग होता. ६०० लोकसंख्या असलेल्या या गावाला आता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. धानोरा ग्रामपंचायती अंतर्गत आठवडी बाजार भरतो. मात्र येथे ओट्यांची संख्या वाढविण्यात आलेली नाही. या बांधकामाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच गावात बीपीएल यादीचे सर्वेक्षणही व्यवस्थित झाले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, असे नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. वन जमिनीचे पट्टेही वाटपही रखडलेले आहे.या भागात भारत संचार निगमची एकमेव दूरसंचार सेवा आहे. वीज जाताच ही सेवा खंडित होते. मोबाईलधारक नागरिक त्रस्त आहेत. या समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.