शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

अहेरी-देचलीपेठा मार्गावरील बसफेरी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा गावात जाण्यासाठी अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षांपासून सुरू हाेती. परंतु ...

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा गावात जाण्यासाठी अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षांपासून सुरू हाेती. परंतु काेरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाने दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या बसफेऱ्या पूर्णपणे बंद केल्या. मध्यंतरी जिमलगट्टापासून ५ किमी अंतरावरील किष्टापूर गावालगतच्या नाल्यावरील रपटा पावसाळ्यात वाहून गेल्याने बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. मात्र आता शासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम केले आहे. या मार्गावरून कोणत्याही प्रकारची वाहने सहज जाऊ शकतात. देचलीपेठा ह्या गावातील नागरिकांना दररोज विविध कामांसाठी अहेरी तालुका मुख्यालयात जावे लागते. नागरिकांना काम आटोपून परत गावी येण्यास कोणत्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे त्यांना अहेरी तालुका मुख्यालयापासून जिमलगट्टापर्यंत यावे लागते. येथील नागरिकांना नेहमीच खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागताे. मात्र अनेक खासगी प्रवासी वाहनधारक मनमानीपणे प्रवासभाडे आकारतात. तसेच वाहनाच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर छत्री घेऊन टपावर बसून प्रवास करावा लागताे. येथील नागरिकांनी वेळोवेळी अहेरी आगार प्रमुखांची भेट घेऊन बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.परंतु आगर प्रमुखांनी देचलीपेठामार्गे बसफेरी पूर्ववत सुरू केली नाही. नागरिकांमध्ये आगार प्रशासनाविषयी राेष व्यक्त हाेत आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या साेयीसाठी देचलीपेठामार्गे बसफेरी लवकर सुरू करावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

बाॅक्स

मिळेल त्या वाहनाने प्रवास

जिमलगट्टा-देचलीपेठा परिसरात १५ ते २० गावांचा समावेश आहे. या भागातील नागरिकांनी वैयक्तिक खासगी तसेच कार्यालयीन कामाकरिता तालुका मुख्यालयात जावे लागते. परंतु नागरिकांना ये-जा करण्यासाठी काेणत्याही प्रकारचे साधन नाही. बसफेरी सुरू असताना नागरिकांना अडचणी येत नव्हत्या. परंतु बसफेरी बंद झाल्यापासून आवागमनासाठी अडचणी येत आहेत.ज्या नागरिकांकडे वाहने आहेत अशा नागरिकांना अडचणी नाहीत. परंतु ज्यांच्याकडे साधने नाहीत अशांना दुसऱ्यांकडील वाहनांचा आधार घ्यावा लागताे. मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करीत तालुका मुख्यालयात यावे लागते.