शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बस वाहकाकडील तिकीट मशीन बंद पडल्याने प्रवाशांना त्रास

By admin | Updated: April 16, 2017 00:34 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कामगिरीमुळे चंद्रपूर-अहेरी ....

भोंगळ कारभार : बल्लारपूर स्थानकावर प्रवासी दोन तास ताटकळतप्रशांत ठेपाले आलापल्ली‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कामगिरीमुळे चंद्रपूर-अहेरी या बसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना बल्लारपूर बसस्थानकावर सुमारे दोन तास भर उन्हात ताटकळत राहावे लागल्याचा प्रकार शनिवारी घडला. एसटी वाहकाकडील तिकीट मशीन बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.चंद्रपूर आगाराची एमएच ४० एन ९९९३ क्रमाकांची चंद्रपूर-अहेरी ही बस शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर आगारातून प्रवाशी घेऊन निघाली. सदर बस बंगाली कॅम्पपर्यंत पोहोचताच बस वाहकाकडील तिकीट मशीन काम करीत नव्हती. मात्र मशीन तत्काळ बदलविण्याऐवजी बस पुढे नेण्यात आली. बल्लारपूर येथे बस पोहोचताच तिकीट मशीन पूर्णत: बंद पडली. बल्लारपूर बसस्थानकाचे काम सुरू असल्याने तिकीट मशीन चार्जींगला लावणे शक्य झाले नाही. दरम्यान बसचालक व वाहकांनी प्रवाशांना पैसे परत देऊ केले. तसेच दुसऱ्या बसमध्ये बसवून देतो, असेही सांगितले. परंतु मागून येणाऱ्या बसेस प्रवाशांनी आधीच भरगच्च भरून असल्याने नवीन प्रवासी त्या बसमध्ये चढविणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी दुसऱ्या बसमध्ये जाण्यास नकार दिला. बस वाहकाकडे दुसरे पर्यायी साधन म्हणजे, प्रिंट तिकीट तथा पंचींग मशीन होती. परंतु बसचे तिकीटदर नसल्याने वाहकाने दुसरे तिकीट प्रवाशांना देऊन बस पुढे नेण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे चालक-वाहक व प्रवाशात शाब्दीक बाचाबाचीही झाली. आलापल्लीचे शिक्षक सतीश खाटेकर यांनी बसच्या चालक वाहकास अशी विनंती केली की, दुसऱ्या बस वाहकाकडून तुम्ही तिकीट दर पत्रक मागून बस नियोजित स्थळी घेऊन जा. परंतु चालक व वाहक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान प्रवाशांचे दोन तास बल्लारपूर बसस्थानकावर प्रतीक्षा करण्यात गेले. अखेर खाटेकर यांनी तिकीट काढलेल्या प्रवाशांना अहेरीपर्यंत घेऊन गेलेच पाहिजे, अशी अट मांडली. तेव्हा दोन तासानंतर प्रवाशी घेऊन बस सायंकाळी ४.१५ वाजता गोंडपिंपरी बसस्थानकावर पोहोचली. या ठिकाणी मशीनची चार्जींग करून बस पुढील प्रवासासाठी निघाली. तिकीट मशीनची चार्जिंग संपल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांचे पाकिट लंपासप्रवाशी म्हणून बसमध्ये हजर असलेले प्रभाकर भानू शेंडे रा. कान्होली ता. चामोर्शी हे चंद्रपूरवरून गोंडपिपरीला एका लग्न कार्यासाठी जात होते. मात्र त्यांनाही दोन तास तेथे थांबावे लागले. बल्लारपूर बसस्थानकावर अज्ञात चोरट्याने शेंडे यांचे पाकिट लंपास केले. यात चार हजार रूपये होते.