शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

बैलबंडीने आणावा लागला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:17 IST

येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही. परिणामी तिच्या कुटुंबीयांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला. मात्र या ठिकाणीही शवविच्छेदन करणारे डॉक्टर नसल्याने सायंकाळी मृतदेह अहेरी रूग्णालयात हलवावा लागला.एटापल्ली तालुका आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील बहुतांश नागरिक हातावर आणून पानावर खातात. एखादेवेळी अनुचित घटना घडल्यास मृतदेह दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी पैसे राहत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा मृतदेह बैलबंडीने आणण्याची नामुष्की ओढवते. त्यामुळे एटापल्ली तालुक्याला विशेष बाब म्हणून शववाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. यापूर्वी तुमरगुंडा येथील एका इसमाला मुलाचे प्रेत खांद्यावर घरी न्यावे लागले होते.शवविच्छेदनासाठी लागतात तीन दिवसदुर्गम भागातील नागरिक घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार करतात. पोलीस त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पंचनामा करतात. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली येथे आणला जातो. याही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नसल्यास मृतदेह अहेरीला हलवावा लागतो. या सर्व प्रक्रियेत तीन दिवस उलटून मृतदेहाची दुर्गंधी सुटते.