शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बंधाऱ्याची योजना रखडली

By admin | Updated: August 23, 2014 01:50 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याची योजना तयार करून शेती सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी ही योजना राज्य सरकारने राबविण्याचे ठरविले होते.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याची योजना तयार करून शेती सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी ही योजना राज्य सरकारने राबविण्याचे ठरविले होते. या योजनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात पाच ठिकाणी पूल कम बंधारे बांधले जाणार होते. मात्र सध्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या एकमेव लघु सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे, अन्य योजनांसाठी शासनाने कवडीचाही निधी दिलेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी जवळजवळ दीडशे किलोमीटरच्या परिघातून जाते. या नदीवर प्रत्येक १० किमी अंतरावर बंधारा बांधावा या माध्यमातून शेती सिंचनाची सुविधा निर्माण होईल. तसेच उद्योग धंद्यानाही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देता येईल, अशी योजना तयार करण्यात आली होती. राज्य सरकारने तत्कालीन आमदार विद्यमान खासदार अशोक नेते सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे तेथील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी सरकारी सूचनेनंतर गेले होते. विधानसभेतही विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याच्या योजनेवर चर्चा होऊन या योजनेला मूर्तरूप देण्याची तयारी सरकारने केली होती. त्यानंतर राज्यातील आघाडी सरकारने वैनगंगा नदीवर बंधारे बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली. उपसा सिंचन योजना सुरू करण्याला सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेज प्र्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वास येत आहे. राज्यपाल महोदयांनीही काही महिन्यांपूर्वी या कामाची पाहणी केली होती. मात्र यासोबत इतर चार योजनांनाही मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी एकाही योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामध्ये गडचिरोली तालुक्यात कोटगल, आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, ठाणेगाव, अहेरी तालुक्यातील महागाव आदी प्रकल्पाचा समावेश होता. या संदर्भात अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी राज्यपालाच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात या योजनांसाठी मंजुरी देण्यात आली. लवकरच यांना निधीही उपलब्ध होईल. आपल्या कार्यकाळातच हे काम झाले आहे, असे सांगून वेळ मारून नेली. उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाला सिंचनासाठी मोठा निधी देण्यात आला, असाही दावा केला. मात्र प्रत्यक्षात चिचडोह बॅरेजशिवाय एकाही प्रकल्पाचे काम अद्याप सुरू नाही. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून मोठ्या निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)