शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याची योजना रखडली

By admin | Updated: August 23, 2014 01:50 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याची योजना तयार करून शेती सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी ही योजना राज्य सरकारने राबविण्याचे ठरविले होते.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याची योजना तयार करून शेती सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी ही योजना राज्य सरकारने राबविण्याचे ठरविले होते. या योजनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात पाच ठिकाणी पूल कम बंधारे बांधले जाणार होते. मात्र सध्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या एकमेव लघु सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे, अन्य योजनांसाठी शासनाने कवडीचाही निधी दिलेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी जवळजवळ दीडशे किलोमीटरच्या परिघातून जाते. या नदीवर प्रत्येक १० किमी अंतरावर बंधारा बांधावा या माध्यमातून शेती सिंचनाची सुविधा निर्माण होईल. तसेच उद्योग धंद्यानाही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देता येईल, अशी योजना तयार करण्यात आली होती. राज्य सरकारने तत्कालीन आमदार विद्यमान खासदार अशोक नेते सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे तेथील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी सरकारी सूचनेनंतर गेले होते. विधानसभेतही विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याच्या योजनेवर चर्चा होऊन या योजनेला मूर्तरूप देण्याची तयारी सरकारने केली होती. त्यानंतर राज्यातील आघाडी सरकारने वैनगंगा नदीवर बंधारे बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली. उपसा सिंचन योजना सुरू करण्याला सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेज प्र्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वास येत आहे. राज्यपाल महोदयांनीही काही महिन्यांपूर्वी या कामाची पाहणी केली होती. मात्र यासोबत इतर चार योजनांनाही मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी एकाही योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामध्ये गडचिरोली तालुक्यात कोटगल, आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, ठाणेगाव, अहेरी तालुक्यातील महागाव आदी प्रकल्पाचा समावेश होता. या संदर्भात अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी राज्यपालाच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात या योजनांसाठी मंजुरी देण्यात आली. लवकरच यांना निधीही उपलब्ध होईल. आपल्या कार्यकाळातच हे काम झाले आहे, असे सांगून वेळ मारून नेली. उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाला सिंचनासाठी मोठा निधी देण्यात आला, असाही दावा केला. मात्र प्रत्यक्षात चिचडोह बॅरेजशिवाय एकाही प्रकल्पाचे काम अद्याप सुरू नाही. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून मोठ्या निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)