शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

नियम डावलून जुन्या वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:40 IST

ज्या जंगलाची घनता ४० प्रतिशतपेक्षा कमी आहे. अशा जंगलातील मुदतबाह्य झाडे तोडून त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करून जंगलाचे संवर्धन करण्याचे नियम असताना.....

ठळक मुद्देस्थानिकांचा विरोध : एफडीसीएम जंगल नष्ट करीत असल्याचा आरोप

ऑनलाईन लोकमतवैरागड : ज्या जंगलाची घनता ४० प्रतिशतपेक्षा कमी आहे. अशा जंगलातील मुदतबाह्य झाडे तोडून त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करून जंगलाचे संवर्धन करण्याचे नियम असताना वन विकास महामंडळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी ४० टक्के पेक्षा अधिक घनता असलेल्या नैसर्गिकरित्या वाढलेल्या घनदाट जंगलाची कत्तल करीत आहे. एफडीसीएमच्या मार्फतीने केली जाणारी कत्तल थांबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.जुने व कालबाह्य झलेल्या वृक्षांची तोड करून आम्ही नवीन मौल्यवान वृक्ष लागवड करू. जंगलाचे संवर्धन करू, अशी माहिती देऊन देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव, चिखली, कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, देऊळगाव, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा वन क्षेत्रातील घनदाट जंगलांची व गौणवनोजप देऊ शकणाऱ्या झाडांची कत्तल केली जात आहे. मागील तीन वर्षांपासून वृक्षतोड करून त्याची साठवणूक देसाईगंज-कुरखेडा मार्गावर असलेल्या डेपोमध्ये केली जात आहे. जुना तोडलेला लाकूड साठा त्याच ठिकाणी पडून आहे. लिलावात विकला जात नसल्याने सदर लाकूड कुजण्याच्या मार्गावर आहे. जुने लाकूड विकले नसताना वन विकास महामंडळ मात्र नवीन झाडांची तोड करीत आहे. त्यामुळे जंगलाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी ज्या वृक्षांचे संवर्धन केले. त्याच वृक्षांवर वन विकास महामंडळ कुऱ्हाड घालत आहे. स्थानिक नागरिकांचा वृक्ष तोडण्यास विरोध असतानाही त्याला न जुमानताच वृक्षांची तोड केली जात आहे. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. वन विकास महामंडळाच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्ह्यातील शेकडो वर्षांचे जंगलच धोक्यात येण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.एफडीसीएम कायद्याचे उल्लंघन करून ४० प्रतिशतपेक्षा जास्त घनता असलेल्या जंगलात वृक्षतोड करीत आहे. वृक्षतोडीमुळे गौणवनोपज नष्ट होत आहे. गौणवनोपज नष्ट झाल्यास स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यामुळे ४० पेक्षा जास्त घनता असलेले जंगल वर्गीकृत करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.- केशव गुरनुले,संयोजन सृष्टी संस्था येरंडीराज्य सरकारच्या अखत्यारित हे काम आहे. जे वृक्ष मुदतबाह्य झाले आहेत. त्यातील १० टक्केच वृक्षांची तोड एफडीसीएम करीत आहे. जंगलातील पूर्ण झाडे तोडत असल्याचा गैरसमज चुकीचा आहे. वन विकास महामंडळ ही खासगी कंपनी नसून सरकारच्या परीपत्रकानुसार काम करते.- डी. एम. राजपूत,विभागीय व्यवस्थापक, ब्रह्मपुरी

टॅग्स :forest departmentवनविभाग